Trolly. 
सोलापूर

ऊस गाळपास जाणाऱ्या ट्रॉलीला पेटवून देण्याचा प्रयत्न ! ऊसदरावरून मंगळवेढ्यातील शेतकरी संतप्त

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने झाले तरी देखील ऊसदराची कोंडी अद्याप फुटली नाही. शिवाय पहिली उचल अडीच हजाराची मागणी असताना ती कमी दिल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काल (रविवारी) रात्री लवंगीच्या भैरवनाथ कारखान्यास ऊस गाळपास जाणाऱ्या ट्रॉलीला बालाजी नगरजवळ पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. 

तालुक्‍यामध्ये एक सहकारी व तीन खासगी साखर कारखाने आहेत. त्यामधील एक कारखाना सध्या बंद असून उर्वरित तीन कारखाने सुरू आहेत. साखर कारखाने सुरू होऊन गेले दोन महिने झाले तरीदेखील उसाला किती दर द्यावा, याबाबत निश्‍चित धोरण ठरले नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला पहिली उचल 2500 रुपये द्यावे, ही मागणी लावून धरली असताना, कारखानदारांनी बैठकीत जो दर ठरेल तो दर देण्याचे जाहीर केले. असे असले तरी ऊसदराची ही बैठक होणार तरी कधी, असा सवाल विचारला जात आहे. 

इतर ठिकाणी उसाला चांगला दर मिळत असताना राज्यात सर्वाधिक जास्त साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत, त्यामुळे ऊस दरासाठी स्पर्धा होऊन शेतकऱ्यांना चांगला दर मिळणे अपेक्षित आहे. असे असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र साखर कारखानदारांनी एकी करून शेतकऱ्याच्या माथी कमी दर देण्याचा सपाटा लावला आहे. अगदी तसाच प्रकार या वर्षी सुरू केला. त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष धुमसत असताना अखेर ऊसदराचे हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केले आहे. तालुक्‍यात गतवर्षी काही खासगी कारखान्यांनी ऊस बिले शेतकऱ्यांना दिली नाहीत, तर एकाच कारखान्याने एकाच तालुक्‍यात नदीकाठच्या एका गावाला वेगळा दर दिल्याचे बोलले जात असताना, मरवडे येथे झालेल्या आंदोलनानंतर साखर कारखान्यांनी दर जाहीर न केल्यामुळे ऊसदराचे हे आंदोलन भविष्यात तीव्र होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT