Anjandhoh vihal Road work in Karmala taluka is of inferior quality 
सोलापूर

डांबरात कुठं मुरतयं पाणी? कार्यकारी अभियंता म्हणाले, मी नाही सर्वत्र लक्ष देऊ शकत 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : तालुक्‍यातील अंजनडोह ते पोंधवडी या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भर पावसात डांबरीकरण सुरू आहे. ग्रामीण भागातील रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोट्यवधीचा निधी दिला जात असताना हा निधी अक्षरशः पाण्यात घातला जात आहे. विशेष म्हणजे याबाबत प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सडक योजनेचे कार्यकारी अभियंता सदाशिव शेळके यांना विचारले असता मी सर्वत्र लक्ष देऊ शकत नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे डांबरात पाणी कुठं मुरतयं? याची चौकशी करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. 
सोमवारी (ता. 29) या भागात जोरदार पाऊस झाला. या भागात 53 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. असे असताना मंगळवारी ठेकेदाराने सकाळी डांबरीकरणाचे काम सुरू केले. विशेष म्हणजे मंगळवारी काम सुरू असतानाच जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. सहा किलोमीटरपैकी चार किलोमीटरचे डांबरीकरण करण्यात आले आहे. काम सुरू असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या कामाच्या दर्जाविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 2018-19 मध्ये येथे रस्ता मंजूर झाला आहे. या कामाचा प्रारंभ तत्कालिन आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते झाला होता. 50 वर्षांत या रस्त्याकडे कोणी लक्ष दिले नव्हते, त्यामुळे रस्ता होणार या आशेने या भागातील नागरिक खूष झाले. मात्र, हा रस्ता दर्जेदार झाला नाही तर किती दिवस हा रस्ता टिकणार हा प्रश्‍न या लोकांना पडला आहे. दीड वर्षापासून या रस्त्यावरचे काम सुरू आहे. याशिवाय खडकेवाडी फाटा ते झरे या रस्त्याचे देखील डांबरीकरण सुरू केले होते. ते काम येथील गावकऱ्यांनी पावसात काम करण्यास विरोध केल्याने मागील आठवड्यात बंद केले आहे. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने अनेक ठिकाणाचे रस्ते खराब होत असतात अशा तक्रारी सर्वत्र होतात. असे असताना जर पावसाळ्यातच कोट्यवधी रुपये मंजूर असलेल्या रस्त्याचे काम केले जात असेल आणि याला अधिकारी पाठीशी घालत असतील तर त्या कामाचा दर्जा कसा टिकणार हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. 
पुणे येथील अधीक्षक अतुल चव्हाण म्हणाले, पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम करता येत नाही. जर सध्या हे काम केले असेल तर हे काम संबंधित ठेकेदाराला पुन्हा एकदा करावे लागेल. याबाबत संबंधित रस्त्याच्या कामाची तत्काळ चौकशी केली जाईल. रस्त्याचे काम इस्टिमेटनुसार होणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT