ad prakash aambedkar
ad prakash aambedkar 
सोलापूर

वीज तोडायला आले तर बडवा ! ऍड. प्रकाश आंबेडकरांचा ग्राहकांना सल्ला

तात्या लांडगे

सोलापूर : ग्राहकांनी वीज वापरली नसतानाही अनेकांना भरमसाठ बिले देण्यात आली आहेत. व्यावसायिक व घरगुती बिलाचे दरही वाढविले. अशा परिस्थितीत कॉंग्रेस नेते तथा उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज बिल माफी द्यायला हवी होती. जेणेकरून ते जनतेत हिरो झाले असते आणि मृत कॉंग्रेस पुन्हा जीवंत झाली असती, असे वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खोटारडेपणा आता उघड झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला आणि वीज तोडायला आलेल्यांना धरून बडवा, असा सल्ला ऍड. आंबेडकर यांनी यावेळी दिला.

ऍड. आंबेडकर म्हणाले...

  • 50 टक्‍के वीज बिल माफ करावे म्हणून वीज खात्याने दिला सरकारला प्रस्ताव
  • कॉंग्रेसचे मंत्री दुबळे, अधिवेशनात वीज बिल माफीचा निर्णय घेतला असता तर मेलेली कॉंग्रेस पुन्हा जीवंत झाली असती
  • सरकारला निर्णय घेतला बारामतीचा अडसर; मुख्यमंत्री सरकार टिकावे म्हणून घाबरत आहेत
  • अजित पवारांनी सभागृहात वीज तोडणीला स्थगिती दिल्याचे सांगितले; पुन्हा वीज तोडणी सुरुच
  • उपमुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा झाला उघड; शेतकऱ्यांच्या पिकांना वीज कपातीमुळे पाणी मिळेना
  • वीज कापायला आल्यास ग्राहकांनी संबंधितांना बडवावे; कितीही गुन्हे दाखल होऊ द्या
  • वीज बिलांबाबत सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांनी माझ्यासोबत चर्चेला बसावे; दरवाढीमुळे वाढली बिलाची थकबाकी
  • वीज तोडायला आले तर बडवा ! ऍड. प्रकाश आंबेडकरांचा ग्राहकांना सल्ला
  • सचिन वाझे प्रकरणी 22 मार्चला राज्यपालांना भेटणार
  • लॉकडाउन जनतेला नकोय; अर्थव्यवस्था कोलमडल्यास जनतेला खायला अन्न मिळणार नाही
  • एकाच राज्यात 17 वेळा जाणे पंतप्रधानांना शोभणारे नाही

कोरोना काळात व्यावसायिकांसह बहुतेक नागरिकांनी वीजेचा वापर तेवढ्या प्रमाणात केला नसतानाही त्यांना बिले वाढीव देण्यात आली. वीजेच्या बिलाची रक्‍कम अथवा एकूण थकबाकी का वाढली, यासंदर्भात सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांनी माझ्यासोबत चर्चेसाठी यावे, असे खुले आव्हानही ऍड. आंबेडकर यांनी यावेळी दिले. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्‍चित करण्याच्या निमित्ताने ऍड. आंबेडकर हे आज सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री कोणताही निर्णय स्वत:हून घेऊ शकत नाही. त्यासाठी त्यांना बारामतीचा अडसर असल्याचेही ते म्हणाले. कॉंग्रेसचे मंत्री दुबळे असून त्यांच्या हातात काहीच नसल्याचेही त्यांनी सांगितले. अडचणीतील जनता, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करून कॉंग्रेस नेत्यांना जनतेत हिरो होण्याची संधी होती. मात्र, त्यांनी तसा निर्णय घेतला नाही. दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांनी अधिवेशन काळात वीज तोडणी स्थगित केल्याचे सांगितले, मात्र आता सर्वत्र वीज तोडणी सुरु असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT