सत्तेत असूनही होईनात कामे! मंगळवेढा तालुका "राष्ट्रवादी' बैठकीत नाराजी
सत्तेत असूनही होईनात कामे! मंगळवेढा तालुका "राष्ट्रवादी' बैठकीत नाराजी Canva
सोलापूर

सत्तेत असूनही होईनात कामे! मंगळवेढा 'राष्ट्रवादी' बैठकीत नाराजी

हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

बळिराम साठे म्हणाले, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती व नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणतेही गटतट न ठेवता मोठ्या ताकदीने लढवणार आहे.

मंगळवेढा (सोलापूर) : राज्यात सत्तेत असून देखील मंगळवेढा (Mangalwedha) तालुक्‍यामधील राष्ट्रवादीच्या (NCP) पदाधिकाऱ्यांची विशेषत: राष्ट्रवादीच्याच सरपंचांची कामे होत नाहीत. कामे होत नसतील तर पक्षात राहून काय फायदा, असा सवाल राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत उपस्थित करण्यात आला. मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, ओबीसी सेल सेलचे लतीफ तांबोळी, रतनचंद शहा बॅंकेचे अध्यक्ष राहुल शहा, उपाध्यक्ष रामचंद्र जगताप, नगराध्यक्षा अरुणा माळी, पक्षनेते अजित जगताप, विजयकुमार खवतोडे, भारत बेदरे, रामेश्वर मासाळ, शिवाजीराव काळे, शिवानंद पाटील, चंद्रशेखर कोंडुभैरी, वृषाली इंगळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी बळिराम साठे म्हणाले, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती व नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणतेही गटतट न ठेवता मोठ्या ताकदीने लढवणार आहे. गावपातळीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम जोमाने सुरू ठेवा.

प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, ग्रामपंचायतीचे सदस्य नसलेली मंडळी व्यासपीठावर दिसता कामा नये. पक्ष संघटनेची पदे देताना देखील विचार करून दिली पाहिजेत.

गुलाब थोरबोले म्हणाले, जिल्हा नियोजन मंडळावर राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. राज्यात सत्ता आहे. स्व. भारत भालके आमदार असताना तालुक्‍यातील ग्रामीण भागातील सरपंचांची कामे होत होती. परंतु अलीकडच्या काळात या सरपंचांची कामे होत नाहीत. ग्रामीण भागातल्या सरपंचांची व कार्यकर्त्यांची कामे झाली पाहिजेत.

पक्षनेते अजित जगताप म्हणाले, पालकमंत्र्यांनी ग्रामीण भागातील सरपंचांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत. पोटनिवडणुकीत नंतर अनेक ठिकाणी कामासाठी आडकाठी होत आहे. त्यामुळे शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांनी संपर्क कार्यालयात थांबून ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न सोडवावेत.

लतीफ तांबोळी म्हणाले, 2024 चा विचार करता, भगीरथ भालके हेच आपले उमेदवार आहेत. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या कामासाठी स्व. भालके अधिकाऱ्यांना फोन करून सांगायचे. परंतु सध्या चार-पाच महिने झाले हे बंद झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT