0sarpancch_2.jpg 
सोलापूर

जिल्हा प्रशासनाकडे नाही पुरेसे मनुष्यबळ ! 9,11 आणि 13 फेब्रुवारी, या दिवशी होणार सरपंचांच्या निवडी

तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामपंचायतींची निवडणूक झाल्यानंतर निकालापासून 30 दिवसांत सरपंच आरक्षण सोडत, निवड आणि पहिली सभा होणे अपेक्षित आहे. ही मुदत 18 फेब्रुवारीपर्यंत असून सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड तीन टप्प्यात केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने सरपंच निवडी तीन टप्प्यात करण्याचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांनी केले असून त्यासंबंधीचा आदेश आज (मंगळवारी) निघेल, अशी शक्‍यता आहे.

जिल्हाधिकारी काढणार आज आदेश
सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. 15 जानेवारीला मतदान तर 17 जानेवारीला मतमोजणी पार पडली. त्यानंतर सरपंच आरक्षण सोडतही झाली असून आता सरपंच निवडीचे वेध लागले आहेत. ग्रामपंचायतींची संख्या जास्त असल्याने आणि तेवढे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सरपंच निवडीचा कार्यक्रम तीन टप्प्यात करण्याचे नियोजन झाले आहे. 9, 11 आणि 13 फेब्रुवारीला सरपंचांच्या निवडी होणार आहेत. मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्‍कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस या तालुक्‍यांमधून तीन टप्पे करण्यात आले आहेत. सरपंचपदासाठी अर्ज स्वीकारणे, माघार आणि निवड व शेवटी सरपंच निवडीची सभा, यासाठी संपूर्ण एक दिवस लागणार आहे. त्यामुळे तीन टप्पे करण्यात आले असून  त्यासंबंधीचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे आज (मंगळवारी) काढतील, असे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा सर्वात मोठा टप्पा पार पडला. निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांत सरपंच निवड करणे अपेक्षित असल्याने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सरपंच निवडीचा कार्यक्रम वेगवेगळा असणार आहे. परंतु, 18 फेब्रुवारीपर्यंत नवा कारभारी ठरणार असून नव्या सदस्यांचा कार्यकाळ सुरु होणार आहे. दरम्यान, काठावर बहूमत मिळविलेल्या गट त्यांचे सर्व सदस्य घेऊन आणि सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्या प्रवर्गातील सदस्याला सोबत सर्वाधिक जागा मिळविलेला गट परराज्यात फिरायला गेले आहेत. आरक्षण सोडत झाल्याच्या रात्रीपासून कुटुंबासह गाव सोडलेल्या सदस्यांना आता सरपंच निवडीच्या कार्यक्रमाचे वेध लागले आहेत. दुसरीकडे सर्वाधिक जागा निवडून आलेल्या गटाकडे सरपंच आरक्षण निघालेल्या प्रवर्गाचा उमेदवार आहे का, त्याच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे का, आपल्या गटातील त्या प्रवर्गाचा सदस्य सरपंच होऊ शकतो का, फिरायला गेलेल्यांपैकी एकादा सदस्य आपल्याकडे येऊ शकतो का, यासह अन्य बाबींचा अंदाज विरोधी गट घेत आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा निवडून आल्यानंतरही चिंतेत असलेल्या गटप्रमुखाला सरपंच निवड लवकर व्हावी, असे वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT