Vairag 
सोलापूर

बार्शी तालुक्‍यात सततच्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग पिकांचे नुकसान; पंचनामे करण्याची मागणी 

कुलभूषण विभूते

वैराग (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात गेल्या दहा दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीन, उडीद व मूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्‍यात सर्वांत जास्त सोयाबीन पीक पेरलेले आहे. सध्या सोयाबीन पीक काढणीच्या भरात आलेले आहे, त्याच वेळी सतत पाऊस पडत असल्यामुळे तसेच पाणी व रोगट हवामानामुळे सोयाबीनचे पीक झाडालाच नासू लागले आहे. तर काही ठिकाणी सोयाबीनचे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. 

तालुक्‍यातील अशा नुकसान झालेल्या मूग, उडीद व सोयाबीन पिकांचे पंचनामे करावेत, या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार किरण जमदाडे यांना देण्यात आले. या वेळी भास्कर काकडे, प्रमोद पाटील, युवराज काजळे, प्रशांत भड, संदीप भड आदी गौडगावचे व तालुक्‍यातील शेतकरी उपस्थित होते. 

यंदा पाऊस वेळेवर झाल्याने शेतकऱ्यांनी सहा एकर सोयाबीन पेरले. पीक चांगले व काढणीला आले असताना सतत सहा दिवस झालेल्या पावसामुळे व शेतात साचलेल्या पाण्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे उत्कर्ष देशमुख (रातंजन, ता. बार्शी) यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Flight Emergency: न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेतच बंद, सहा तास आकाशात राहिल्यानंतर ... मोठी दुर्घटना टळली!

Sambhajinagar PM Awas Yojana: ९४ कुटुंबांच्या घराचे स्वप्न साकार; फुलंब्रीत आवास योजनेची मंजुरी पत्रे वाटप; कच्च्या घरातून पक्क्या घराकडे वाटचाल; फुलंब्रीत लाभार्थ्यांना दिलासा

Paithan Toilet Vandalism: ७० लाखांची स्वच्छतागृहे बंदच; पैठणमध्ये तोडफोडीने नागरिक संतप्त; उद्‍घाटनाआधीच स्वच्छतागृहांची मोडतोड

Mumbai Crime : मुंबई हादरली ! पतीने पत्नीला धावत्या लोकल ट्रेनखाली ढकलले, धक्कादायक कारण समोर

राज्यसभा निवडणुकीत विरोधकांची गेम, भाजपने पुरेसं संख्याबळ नसतानाही २ जागा जिंकल्या; काँग्रेसला आमदारांचा दगा, काय घडलं?

SCROLL FOR NEXT