Kisan Railway 
सोलापूर

वाढत्या प्रतिसादामुळे सांगोल्यातून आणखी दोन किसान रेल्वे सुरू करण्याची होतेय मागणी !

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : शेतकऱ्यांचा किसान रेल्वेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याने शेतीमाल व जीवनावश्‍यक वस्तूंची जलदगतीने वाहतूक करण्यासाठी सांगोला रेल्वे स्थानकातून दिल्लीसाठी आणखी दोन किसान रेल्वे सुरू करण्याची मागणी सोलापूर रेल्वे मंडळ समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे केली आहे. तसेच द्राक्ष, खरबूज, कलिंगड व बोर या फळांना देखील वाहतूक दरात 50 टक्के सवलत मिळावी, अशी मागणी केली असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली. 

सांगोला तालुक्‍यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती मालाला दिल्लीची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगोला मार्गे किसान रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल, सोलापूर रेल्वे मंडळ समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून, रेल्वे मंत्रालयाने सांगोला ते मुझफ्फरपूर, बंगळूर - सांगोला - आदर्शनगर (दिल्ली), सांगोला - सिकंदराबाद, सांगोला - शालिमार (कोलकता) या चार किसान रेल्वे सांगोल्यातून सुरू केल्या आहेत. 

शेतीमाल, भाज्या, फळे या घटकाच्या व्यापाराकरिता व्यापारी, शेतकऱ्यांना किसान रेल्वे उपयुक्त ठरली आहे. शेतकऱ्यांचा किसान रेल्वेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याने शेतकऱ्यांसह रेल्वेलाही फायदा झाला आहे. शेतीमाल व जीवनावश्‍यक वस्तूंची जलदगतीने वाहतूक करण्यासाठी सांगोला रेल्वे स्थानकातून मंगळवार व गुरुवार या दोन दिवशी आदर्श नगरसाठी (दिल्ली) आणखी दोन किसान रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वेमंत्री पियुष गोयल व खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे केली असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष केदार-सावंत यांनी दिली. 

द्राक्ष, खरबूज, कलिंगड, बोरासाठी मिळावी सवलत 
केंद्राच्या आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने प्रायोगिक तत्त्वावर ऑपरेशन ग्रीन योजनेचा विस्तार करून फळे आणि भाजीपाला या कक्षेत आणण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार फळे व भाजीपाला रेल्वेतून वाहतूक करण्यासाठी 50 टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यात द्राक्ष, खरबूज, कलिंगड व बोर या फळांना देखील वाहतूक दरात 50 टक्के सवलत मिळावी, अशी मागणी चेतनसिंह केदार-सावंत यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Cricketer Death : भारताच्या क्रिकेटपटूचा मृत्यू! फलंदाजी करून परतत असताना जमिनीवर कोसळला, तडफडला अन्...; वाचा दुर्दैवी घटना

Nilanga News : आधार कार्डमधील विसंगतीचा विद्यार्थ्यांना फटका; निलंग्यात सात हजार ८३४ विद्यार्थी ‘अपार’ आयडीविना

ठरलं तर मग फेम अभिनेत्री गेली 17 वर्षं करतेय या आजाराचा सामना; "माझी ऐकू येण्याची क्षमता.."

BMC Budget : देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचे बजेट किती? कुठून येतो एवढा पैसा?

MAH-CET 2026 : बी.एड. आणि एलएल.बी. करिअरची दारे उघडली! सीईटी नोंदणी सुरू; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

SCROLL FOR NEXT