Eknath Khadse career in the BJP was hampered by his statement in Pandharpur 
सोलापूर

पंढरपुरातील 'त्या' वक्तव्यानेच एकनाथ खडसेंच्या भाजपमधील कारकिर्दीला घरघर 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : भाजप वाढीपासून ते राज्यात सत्तेचा सोपान चढेपर्यंत सलग 40 वर्षे पक्षासोबत सावलीसारखे राहणाऱ्या जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या महापुजेवेळी केलेले राजकीय वक्तव्य त्यांना भोवले होते. त्या वक्तव्यानंतर सहा वर्षांनी त्यांना भाजप सोडून राष्ट्रवादीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश करावा लागला आहे. खडसे यांनी त्यावेळी आपल्या भावनेला वाट मोकळी करुन दिली नसती तर कदाचीत ते आज पक्षात कायम राहिले असते, अशी चर्चा राजकीय विश्वात रंगली आहे. 

राज्यात 2014 च्या निवडणूकीनंतर भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाले. ज्येष्ठ म्हणून आपणास मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. परंतु, भाजप प्रदेशाध्यक्ष असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. तेव्हाच श्री. खडसे काहीसे नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्याकडे महसूल, कृषी, उत्पादन शुल्क अशी महत्वाची सहा ते सात खाती देण्यात आली होती. महसूलमंत्री पद असल्याने एकनाथ खडसेंना प्रथमच पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठल रुक्‍मिणीची महापूजा करण्याची संधी मिळाली होती. खडसे कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना बहुजनाचा मुख्यमंत्री झाला असता तर मला आनंद झाला असता असे सूचक वक्तव्य करुन मुख्यमंत्री पद न मिळाल्याची खंत व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यावेळी भाजपात मोठी खळबळ उडाली होती. 

त्यांच्या याच वक्तव्यावरुन मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीसही चांगलेच नाराज झाले होते. परंतु त्यांनी कधीही त्यांच्याबद्दलची नाराजी उघडपणे बोलून दाखवली नाही. त्यानंतरच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय दरी वाढत गेली. साधारण एका वर्षातच एकनाथ खडसे यांच्यावर अनेक आरोप झाले. आरोपानंतरच त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांचे ते वक्तव्यच त्यांना शेवटपर्यंत अडचणीचे ठरले. सर्व आरोपामधून त्यांची निर्दोषमुक्तता झाल्यांतरही त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील खडसेंना डावलण्यात आले. खडसेंनी अनेकवेळा फडणवीस यांच्याविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. 

शेवटी पक्ष सोडताना खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठपका ठेवूनच भाजपला रामराम केला. गेल्या सहा वर्षाच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्षाला आज त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या घोषणेने पूर्णविराम मिळाला. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT