निवडणूक आयोग sakal
सोलापूर

ओबीसींशिवाय की ओबीसींसह निवडणूक! महापालिकेवर आजपासून 'प्रशासक'राज

निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भातील बिल राज्य सरकार उद्या दोन्ही सभागृहात मांडणार आहे. पण, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अहवाल तयार करून न्यायालयात सादर करण्यासाठी साधारणत: तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो..दुसरीकडे राज्य सरकारचा निर्णय अंतिम की राज्य निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : भाजप सत्ताधाऱ्याचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपला असून उद्यापासून (सोमवार) महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती सोपविला जाणार आहे. महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, सभागृहनेते यांच्याकडील वाहने काढून घेतली जातील. त्यानंतर निवडणूक होऊन महापौर निवड होईपर्यंत महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर हे महापालिकेचा संपूर्ण कारभार सांभाळतील.

शहरातील प्रारुप प्रभाग रचनेवरील आक्षेप, हरकतींवर सुनावणी पार पडली. अधिकाऱ्यांनी हरकती, सूचनांवर निर्णय घेऊन प्रभाग रचनेच्या मान्यतेचा प्रस्ताव 2 मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला. त्यावर अजूनपर्यंत अंतिम निर्णय झालेला नाही. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्या तयार होतील. मतदार याद्यानंतर प्रभागनिहाय आरक्षण जाहीर होईल. तत्पूर्वी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने सादर केलेला अहवाल फेटाळल्यानंतर निवडणुका पुढे ढकलण्याच्या दृष्टीने राज्य सरकार विशेष कायदा करणार आहे. निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य सरकार स्वत:च्या अखत्यारित घेणार असून सोमवारी (ता. 7) त्यासंदर्भात अंतिम निर्णय होईल. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेची निवडणूक किती दिवस लांबणीवर पडणार, किती महिने प्रशासकाच्या माध्यमातून कारभार चालविला जाणार, यासंदर्भातील स्पष्टता उद्याच (सोमवारी) होणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने प्रशासकीय कारभार सांभाळताना आयुक्‍तांना उत्पन्न वाढीसाठी ठोस प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांच्या कारभाराकडे भाजपसह महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांचे लक्ष असणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाची भूमिका निर्णायक
सोलापूरसह राज्यातील बहुतेक महापालिकांची मुदत उद्या (सोमवारी) संपुष्टात येणार आहे. निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भातील बिल राज्य सरकार उद्या दोन्ही सभागृहात मांडणार आहे. पण, निवडणूक पुढे ढकलून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अहवाल तयार करून न्यायालयात सादर करण्यासाठी साधारणत: तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो, अशीही शक्‍यता आहे. दुसरीकडे राज्य सरकारचा निर्णय अंतिम राहणार की राज्य निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरीही, महापालिकांची निवडणूक मे महिन्यात ओबीसी आरक्षणाशिवाय घेतली जाऊ शकते, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT