UMED ABHIYAN.jpg
UMED ABHIYAN.jpg 
सोलापूर

कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती द्यावी ; ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील कर्मचाऱ्यांची मागणी 

प्रकाश सनपूरकर

सोलापूर,; ग्रामीण जिवनोन्नती अभियानातील कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी शासनाकडे केली आहे. जिल्हा परिषदेने त्याबाबत ठराव मंजूर केला आहे. 

गरीब घटकातील महिलांच्या संस्था बांधणी व क्षमता बांधणी करुन त्यांना गरिबीतून बाहेर काढण्याचे काम केले जाते. तसेच या महिलांना शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्याचे काम केले जाते. जिल्ह्यात आतापर्यंत 20 हजार स्वयंसहायता समूह स्थापन केले आहेत. त्यामाध्यमातून दोन लाख 500 महिलांना सहभागी करून घेतले आहे. त्यांचा अर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी बॅंकांच्या माध्यमातून या महिलांना 1400 कोटी रुपयापेक्षा अधिक अर्थसहाय्य कर्जस्वरुपात केले गेले. 

जिल्ह्यामध्ये अभियानाच्या अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर एकूण 57 कर्मचारी कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. शासनाच्या विविध योजना अभियानाच्या माध्यमातून कुटुंबापर्यंत पोचवल्या आहेत. या कामगिरीमुळे महिलांची सावकारी, खासगी मायक्रोफायनान्स करणाऱ्या जाचक यंत्रणेतून सुटका झाली आहे. अभियान व बॅंकेच्या माध्यमातून मिळालेल्या अर्थसहायामुळे व क्षमता बांधणीमुळे शाश्‍वत उपजिवीका निर्माण झाली आहे. या महिलांचे कर्ज परतफेडीचे प्रमाण शंभर टक्के आहे. वंचित महिलांची आर्थिक व सामाजीक सुधारणा झाली. 
"उमेद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (मुंबई) यांनी एका आदेशाद्वारे या अभियानातील कर्मचाऱ्यांना पुर्ननियुक्ती देऊ नये असे आदेश काढले आहेत. हे अभियान खासगी संस्थेकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे वंचित कुटुंबे व कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या पूर्वी स्वर्णजयंती रोजगार योजना बाह्य स्वयंसेवी संस्थाना दिल्याने पैशाचा अपहार होऊन चांगली योजना बंद पडली. या बाबीचा विचार करून या कर्मचाऱ्यांना पूर्ननियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. 

"झेडपी'च्या सभेत कार्यमुक्त न करण्याचा ठराव 
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करणे व हे अभियान बाह्य संस्थेला देण्यात येऊ नये, असा ठराव एकमताने मंजुर झाला. हा विषय सदस्य सचिन देशमुख, उमेश पाटील यांनी मांडल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांनी त्यास मान्यता दिली. या बाबतचे निवेदन जिल्हा अभियान व्यवस्थापक मीनाक्षी मडवळी, जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव, जिल्हा व्यवस्थापक भगवान कोरे, नरेंद्र साखरे, प्रमोद चिंचुरे, रुतीका गायकवाड, पुनम दुध्याल यांनी दिले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT