Solapur Bus News  Sakal
सोलापूर

Solapur Bus News : बसस्थानकातील अतिक्रमणामुळे अपघाताला निमंत्रण; एसटी महामंडळाच्या चालकांसाठी ३१ प्रकारचे नियम

प्रवासी सुरक्षितता ही राज्य परिवहन महामंडळाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मात्र, नुकतेच मंगळवेढा बस स्थानकावर प्रवाशाच्या पायावरून बस गेली.

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : स्वस्त आणि सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळाचा बसला प्रवाशांचा प्राधान्यक्रम असतो. खासगी वाहनांच्या तुलनेने एसटीच्या अपघातांची संख्या अत्यल्प असली तरी बसस्थानक परिसर व स्थानकातील अतिक्रमणामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

प्रवासी सुरक्षितता ही राज्य परिवहन महामंडळाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मात्र, नुकतेच मंगळवेढा बस स्थानकावर प्रवाशाच्या पायावरून बस गेली. त्यामुळे बसस्थानकातच प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एस.टी. महामंडळात वाहन चालकाची निवड, प्रशिक्षण, प्रोत्साहन, आरोग्य यांसह बसेसची देखभाल व दुरुस्ती यावर काटेकोरपणे लक्ष दिले जाते. तसेच पावसाळ्यातील अपघात रोखण्यासाठी दक्षतेबाबतच्या सूचना संबंधितांकडून वारंवार देण्यात येतात.

यामध्ये साधारण महामंडळाच्या वाहकांसाठी सुरक्षित प्रवासी वाहतुकीसाठी तब्बल ३१ नियमावली आहेत. त्या आदेशाचे पालन करणे हे बंधनकारक असते. एसटीवर महामंडळाचे नियंत्रण असते.

तुलनेने खासगी वाहनांतून प्रवास अधिक धोक्याचा असतो. परंतु सोलापूरसह सर्वच बसस्थानकात व स्थानक परिसरात फळ विक्रेते, पाणी विक्रेत्यांच्या सतत फेऱ्या सुरू असतात, तर कधी विक्रेते बसस्थानकातच ठिय्या मांडून बसलेले असतात. या अतिक्रमणामुळे प्रवाशांची स्थानकामध्ये सततची ये-जा सुरू असते. ही एकंदरीत परिस्थिती पाहता अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे.

काय आहेत नियम

  • अतिवेगाने वाहन चालवू नये, वेगाचे नियमांचे पालन व्हावे

  • चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे

  • सावधगिरी न बाळगता रस्त्यावर अचानक वाहन न थांबविणे

  • दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे

  • आवश्यक ती काळजी न घेता वळण घेणे

  • वाहन चालविताना भ्रमणध्वनीचा वापर न करणे

पावसाळ्यातील नियम

  • अत्यंत दक्ष पद्धतीने वाहनावर नियंत्रण राहील इतकाच वेग असावा

  • वाहतूक मार्गावरील पुलांची प्राथमिक माहिती घेणे

  • पुलावरून पाणी वाहताना कोणत्याही परिस्थितीत पूल ओलांडू नये.

  • पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला भराव, जमिनी भुसभुशीत होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जास्त रस्त्याच्या एकदम कडेने वाहन चालवू नये

  • पावसामुळे रस्ते निसरडे होतात, अशावेळी अचानक ब्रेक दाबल्याने कोणताची अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते त्यामुळे वाहनाचा वेग कमी ठेवावा

  • चालकाने बस फेरीवर नेण्यापूर्वी वाहनाचे ब्रेक, स्टिअरिंग, ब्रेक प्रेशर, ऑइल प्रेशर, दिवे आदी बाबी काळजीपूर्वक तपासूनच घेऊन जावे.

  • पावसाळ्यात गळक्या बसेस, पावसाचे पाणी आत येणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. तसेच यांत्रिकदृष्टया सक्षम असल्याची पडताळणी करावी.

महामंडळाच्या बसेसच्या अपघाताचे प्रमाण अगदी नगण्य आहे. बसस्थानकामध्ये नागरिकांनी इतरत्र न फिरता प्रवाशांना उभारण्यासाठी दिलेल्या शेडच्या ठिकाणीच उभारावे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी नियमांचे स्वतंत्र परिपत्रक काढले जाते. चालकांना सक्त सूचना दिलेल्या असतात. बसस्थानकाच्या बाहेर असलेल्या अतिक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे.

- अजय पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT