सोलापूर : कांदा निर्यातीवर सध्या बंदी असल्याने कांद्याचे दर तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विटल सुरू असून याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च तरे सोडा पण काढणी व वाहतूक खर्चही सुटणार नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. मागील वर्षी यंदाच्या पाचपट दर होता. तेव्हा कुठे तरी शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडत होते. असाच दर राहिला तर शेतकऱ्यांना कांदा शेतातच गाडावा लागणार आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी 200 गाड्यांची आवक झाली. सध्या बाजारात मागणी चांगली असली तरी आवक मोठ्या प्रमाणात आले. नियमित दोनशेच्या आसपास गाड्या मार्केट यार्डात दाखल होत आहेत. सध्या कांदा सिजनची ही सुरवात असून अजून मोठ्या प्रमाणात कांदा शेतकऱ्यांच्या वावरात आहे. यामुळे लवकरात लवकर कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी कांदा उत्पादकांमधून होत आहे.
आतिवृष्टी व महापूरामुळे आगोदरच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कांदा उत्पादनातून काही तरी हातभार लागेल, अशी अशा होती, मात्र शेतकऱ्यांना त्याचाही खर्चही पदरात पडणे मुश्किल झाले आहे. सध्या किरकोळ बाजारात चाळीस ते पन्नास रुपये प्रतिकिलो कांदा विक्री होत असली तरी यार्डात शेतकऱ्यांच्या पदरात चांगल्या कांद्याला प्रतिकिलो तीस पस्तीस रुपये पडत आहेत. यात कांद्याची काढणी, कापणी व हताळणीची मजुरी, बारदाणा, वाहतूक व इतर खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या पदरात काहीही राहत नाही. यामुळे यंदा कांदा उत्पादनकांना बी, लागवड व खत, खुरपणी, फवारणी यावर झालेले खर्चही निघत नाही. यामुळे लवकरात लवकर कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी होत आहे.
यंदा लागवडीवर सर्वाधिक खर्च
कोरोनाच्या काळात लॉकडाउन सुरू असताना कांद्याचे रोपे तयार करावी लागत होती. या काळात शेतात मुजर येत नसत तसेस शहरात जाणे व बी बियाणे खरेदी करणे सोडा, पण फिरणेही मुश्किल होते. अशा अवस्थेत दुकानादारांना दादापुता करून बियाणे मिळवले. अतिवृष्टीमुळे लागवड केलेले कांदे वाहून गेले. अनेकांना पुन्हा कांदा लागवड करावी लागली. जास्तीच्या पावसामुळे अधिक तण झाल्याने मुजरीवरील खर्च वाढीव आला आहे. तशातच ऐन दिवाळी हवामान बदल होऊन पाऊस व ढगाळ हवामान यामुळे रोगराईपासून कांदा पिकाचे रक्षण करण्यासाठी अतिरिक्त फवारण्या कराव्या लागल्या आहेत.
शेतकरी संघटना गप्पच
नेहमीप्रमाणे उसाचा दर ठरविण्याच्या कामात गुंतलेल्या शेतकरी संघटनांच्या कांदा उत्पादक गावीही नाही. ऊस उत्पादक व साखर कारखानदार यांच्यातील ऊस दरवाढीवरून होणारा वाद व आंदोलन हे गेल्या अनेक वर्षात वार्षिक कार्यक्रम झाला आहे. मात्र मध्यमवर्गिय शेतकऱ्यांसाठी कांदा हेही तितकेच महत्त्वाचे पिक असल्याने कांद्यावरील निर्यात उठणे तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, उसाच्या आंदोलनात हिरिरीने पुढे होणाऱ्या शेतकरी संघटना कांदा निर्यात बंदीच्या विरोधात पुढे येताना दिसत नाहीत.
आकडे बोलतात
आजची आवक 200 ट्रक
मागील वर्षीचे दर 15 ते 19 हजार रुपये प्रति क्विटल
यदांचे दर तीन ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विटल
सध्याची किराकोळी विक्री 35 ते 50 रुपये प्रतिकिलो
संपादन : अरविंद मोटे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.