MSEDCL 
सोलापूर

शेतीसाठी केवळ एक तास वीज ! थकबाकी वसुलीसाठी महावितरणचा अजब फंडा; शेतकऱ्यांमध्ये संताप 

संतोष सिरसट

उत्तर सोलापूर : जिल्ह्यात महावितरणने शेतीसाठी केल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्यामध्ये कमालीची कपात केली आहे. दिवसा आठ तास व रात्री दहा तास वीज शेतीसाठी दिली जात होती. मात्र आता महावितरणने केवळ एक तास वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकी वसुलीसाठी हा अजब फंडा महावितरणने अवलंबला असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 

शेतीची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ती थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शेतीसाठी दिली जाणारी वीज एक तासावर आणण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. मागील आठवड्यात झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांचे वीज कनेक्‍शन तोडण्यास स्थगिती दिली असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यामुळे वीज तोडणी थोड्या प्रमाणात जरी थांबली असली तरी शेतीसाठी केला जाणारा वीजपुरवठा मात्र एक तासावर आणल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

दुसरीकडे, महावितरणने थकबाकी वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. शेतीसाठीची मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने ती भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही शेतकऱ्यांकडे महावितरणची मोठ्या प्रमाणात थकबाकी होती. मात्र त्या सरकारने कधीही वीज तोडण्याचा व शेतीसाठी कमी वीज देण्याचा निर्णय घेतलेला नव्हता, अशा प्रतिक्रियाही आता शेतकऱ्यांमधून उमटू लागल्या आहेत. त्यामुळे पूर्वीचे सरकार बरे होते, असेही म्हटले जाऊ लागले आहे. 

शेतकऱ्यांना नेहमी नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. यंदाच्या वर्षी आलेल्या उशिरा पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस झाल्याने पीक चांगले आले; मात्र सध्या बाजारात दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आला आहे. त्यातच आता महावितरणने केवळ एक तास वीज देण्याचा निर्णय घेतल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना जिकिरीचे होऊ लागले आहे. त्यामुळे महावितरणने सुरू केलेली ही मोहीम तत्काळ थांबवण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. शेतीसाठी दिवसा आठ तर रात्री दहा तास वीजपुरवठा करण्याची मागणीही शेतकऱ्यांमधून केली जाऊ लागली आहे 

शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. ती त्यांनी ताबडतोब थांबवावी. त्याचबरोबर शेतीसाठी पूर्वीप्रमाणे वीजपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल. 
- सुभाष देशमुख, 
आमदार 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

SCROLL FOR NEXT