सोलापूर

कत्तलखान्याच्या प्रश्‍नावर गांधीवादी विलासभाई शहा यांनी दिला आत्मदहनाचा इशारा 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः बोरामणी, दोड्डी भागातील कत्तलखाना प्रकरणी सोलापूर प्रादेशीक प्रदुषण कार्यालयाने दिलेल्या कारवाईच्या मुदतीपर्यंत म्हणजे ता.19 पर्यंत कारवाई न झाल्यास कत्तलखान्यासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा प्राणी मित्र व ज्येष्ठ गांधीवादी नेते विलासभाई शहा यांनी दिला आहे. 

वयोवृध्द गांधीवादी नेते विलासभाई शहा यांनी या आंदोलनाच्या संदर्भात भूमिका मांडली आहे. 
श्री.शहा यांनी कत्तलखान्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गांधी जयंतीला म्हणजे शुक्रवारी (ता.2) रोजी सोलापूरच्या प्रादेशीक प्रदुषण कार्यालय येथे बेमुदत उपोषण सुरू केले होते. या कत्तलखान्याचा कोट्यावधी रुपयांचा वार्षिक व्यवहार आहे. दरवर्षी 65 लाख मुक्‍या जनावरांची कत्तलीच्या संदर्भात श्री.शहा यांनी हे आंदोलन सूरू केले आहे. मुक्‍या जनावरांची हत्या ही मानव हत्याच आहे अशी त्यांची भूमिका असल्याने त्यांनी हा लढा उभारला. या पुर्वी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी त्यांच्या लढ्याची दखल घेऊन संबंधीत कत्तलखाना कंपनीचा परवाना तत्काळ रद्द केला होता. त्यानंतरच्या काळात नविन सरकार आल्यावर राजकीय दबावापोटी पुन्हा रद्द झालेली परवानगी देण्यात आली. शासनाकडुन या कत्तलखाना कंपनीच्या संदर्भात न्याय मिळत नाही. जर राज्य शासनाकडून न्याय मिळणार नसेल तर आत्मदहन करूनच सरकारची झोप उडेल असा इशारा त्यांनी दिला आहे. 

श्री.शहा यांना संबंधित कत्तलखाना कंपनीने आम्ही आमच्या कंपनीत गायीची हत्या करत नाहीत असे कळवून बदनामी केली तर कायदेशीर कारवाई करूअशी नोटीस पाठवली आहे. वास्तविक पाहता बोरामणी व दोड्डी ग्रामपंचायतीनी जनावरांच्या कत्तलीने परिसराचे प्रदूषण वाढून लोकांचे जीवनमान धोक्‍यात आले आहे असा इशारा या ग्रामपंचायतीनी एकमुखी ठराव मंजूर करून दिलेला आहे. हे ठराव प्रदुषण मंडळाला देण्यात आलेले आहेत. तरीही अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. बेमुदत उपोषणानंतर प्रदुषण मंडळाने ता. 19 पर्यंत या प्रकरणी कारवाई करून असे आश्‍वासन दिले होते. त्याची अमंलबजावणी न झाल्यास आत्मदहनाचा पर्याय श्री.शहा स्विकारणार आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आता सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी तरी या प्रकरणी लक्ष घालावे अशा मागणी केली जात आहे. 

सकारात्मक निर्णय तातडीने व्हावा 
ज्येष्ठ गांधीवादी नेते विलासभाई शहा यांनी मागील काही काळापासून सातत्याने या प्रश्‍नावर लढा दिला आहे. त्यांच्या भूमिकेच्या संदर्भात शासनाने सकारात्मक विचार करून निर्णय घेतले पाहिजेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या प्रश्‍नी लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. 
- माधव वैद्य, अध्यक्ष गांधी फोरम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT