Akluj Rain
Akluj Rain 
सोलापूर

मुसळधार पावसाने केला शेतकऱ्यांचा घात ! अकलूज व परिसरातील पिके व फळबांगाचे अतोनात नुकसान 

शशिकांत कडबाने

अकलूज (सोलापूर) : अकलूज व परिसरात शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस पावसाने झोडपले. या पावसाने शेतातील उभी पिके, मळणीसाठी काढलेली कणसे व तयार धान्य मालाचे अतोनात नुकसान झाले आहे. 

अकलूज व परिसरात शनिवारी सायंकाळी तुफान वादळी वारे, विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मोठा पाऊस झाला. दोन-तीन दिवसांपासून कमालीच्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. शनिवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस अधूनमधून मोठ्या सरीसह रात्रभर पडता राहिला. रविवारी (ता. 11) सकाळी पावसाने थोडी उघडीप दिली. सकाळी सर्व व्यवहार सुरू झाले मात्र दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा पावसाने झोडपून काढले. 

हवामान खात्याने इशारा दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी सोयाबीनची मळणी करण्याची लगबग सुरू केली होती. ढगाळ हवामान पाहून शेतकऱ्यांनी वाटेल त्या किमतीमध्ये सोयाबीन व मकेची काढणी करून घेतली. सगळीकडे एकाच वेळेस पीक काढण्याची कामे आल्याने मजुरांनी मजुरी दुप्पट केली होती. अशाही परिस्थितीत आलेला माल पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी घाईगडबड केली. काही जणांच्या मळणी मशिन चालू असतानाच पावसाने घाला घातला तर काही जणांची सोयाबीन रानातच भिजून गेले. बाजरी काढून पडलेली आहे तर मक्‍याची कणसे रानातील पाण्यात पोहत आहेत. 

जून महिन्यापासून कमीअधिक प्रमाणात पडत असलेल्या पावसाने काही क्षेत्रामध्ये आजही पाणी वाहत आहे तर ऊस लागवडीसाठी सोडलेल्या साऱ्या गवताने तुडुंब भरली आहेत. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मशागत करावी लागत असल्याने खर्च वाढत आहे. ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे, परंतु ऊस तोडणी कामगार, ओली राने, चिखल पाहून परत जात आहेत. पाऊस नाही थांबला तर किमान पंधरा दिवस तरी ऊस तोडणी करता येणार नाही. अशी परिस्थिती सगळीकडेच असून काही ठिकाणी माळरानातील ऊस तोडणी करता येईल अशी स्थिती आहे. 

पावसाने डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, फळे झाडालाच नासून गेलेली आहेत. तर पपई झाडे मोडून पडली आहेत. केळीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने उभे वाढलेले ऊस आडवे पडले आहेत. त्यामुळे उताऱ्यात घट येणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी तीन दिवस पाऊस राहणार असल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. रविवारचा पाऊस कमीअधिक प्रमाणात सर्वदूर होता. मागील पंधरा दिवसांखाली झालेले प्रचंड पर्जन्यवृष्टीचे पंचनामे झाले आहेत; परंतु नुकसान भरपाई कधी मिळणार, याची शेतकरी वाट पाहात आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT