sakal
सोलापूर

मंगळवेढा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; पिकांचे नुकसान

उत्तरा नक्षत्राच्या दमदार पावसामुळे मंगळवेढा शहर व तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या दमदार पावसामुळे पिकाच्या नुकसानी बरोबर पुर्व भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : उत्तरा नक्षत्राच्या दमदार पावसामुळे मंगळवेढा शहर व तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या दमदार पावसामुळे पिकाच्या नुकसानी बरोबर पुर्व भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. सर्वात जास्त पाऊस बोराळे तर सर्वात कमी पाऊस हुलजंती महसूल मंडळांमध्ये नोंदवण्यात आला.

गेल्या काही दिवसापासून अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले होते अशात गणेशोत्सवात दमदार पावसाच्या अपेक्षित असलेल्या शेतकऱ्यांना त्या कालावधीत पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे खरीप हंगामात अल्पशा पावसावर होऊन आलेली पिके सुकून गेली. मात्र उत्तरा नक्षत्रातील दमदार पावसाची हजेरी आंधळगाव, बोराळे, मंगळवेढा या तीन महसूल मंडळात लावली. शहर,पश्चिम व पूर्व भागातील सूर्यफूल, बाजरी, तुर, कांदा, मका या प्रमुख पिकासह फळ पिकाचे नुकसान झाले आहे.

एस वाय मंगळवेढा बोराळे, बोराळे ते रहाटेवाडी , तांडोर-तामदर्डी ते रहाटेवाडी या गावाला दळणवळण असणाऱ्या पुलावर पाणी आल्यामुळे या गावाची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे या भागातील या मार्गावर पुलांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात असताना प्रशासन पातळीवरून पुलाच्या कामासाठी विलंब होत असल्यामुळे याचा त्रास या भागातील नागरिकांना सोसावा लागत आहे अशा परिस्थितीत एखाद्या आजारी माणसाला उपचारासाठी दवाखान्यासाठी नेताना विलंब झाल्यास यात नाहक रुग्णांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याची जबाबदारी कोण स्वीकारणार ? असा सवाल या भागातील नागरिकांतून विचारला जात आहे.पावसामुळे शहरात विद्युत पुरवठा खंडित झाला. नगरपालिकेच्या अनेक व्यापारी गाळ्यामध्ये पाणी आल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले आहे तालुक्यातील सात महसूल मंडळांमध्ये काल रात्री नोंदविला पाऊस मि.मि.मध्ये पुढीलप्रमाणे ,मंगळवेढा 45,मरवडे 13,आंधळगाव 53,मारापूर 40,भोसे 9,बोराळे 59,हुलजंती 7,सरासरी 32.28 मि.मी. पावसाची नोंद नोंदवण्यात आले तर नव्याने झालेल्या पाठखळ महसूल मंडळांमध्ये पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले नाही.

"अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांनी कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा क्रॉप इन्सुरेन्स ॲप द्वारे नुकसान झाल्यापासून ७२ तासाच्या आत कंपनीला तक्रार दिली तरच पिक विम्याची नुकसान भरपाई मिळणे शक्‍य होणार आहे."-गणेश श्रीखंडे तालुका कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT