20Lockdown_2011.jpg 
सोलापूर

Breaking ! दुचाकीस्वारांकडे हेल्मेट आवश्‍यकच; चौदाशे वाहनचालकांचे वाहन परवाने निलंबित

तात्या लांडगे

सोलापूर : हेल्मेट नाही, सिटबेल्टचा वापर केला नाही, अतिवेगाने वाहन चालविले, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, दारु पिऊन वाहन चालविणे, विरुध्द दिशेने वाहन चालविणे, माल वाहतूक वाहनातून प्रवासी वाहतूक केली आणि सिग्नल तोडणाऱ्या तब्बल एक हजार 392 वाहन चालकांचे परवाने निलंबीत करण्याची कार्यवाही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरु झाली आहे.

अपघात कमी होऊन अपघाती मृत्यू रोखण्यासाठी शहर व ग्रामीण वाहतूक पोलिस, आरटीओ व राष्ट्रीय महामार्ग पोलिसांच्या वतीने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे 61 हजार बेशिस्त वाहनचालकांकडून अडीच कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यात हेल्मेट नसलेल्या 23 हजार दुचाकीस्वारांचा समावेश आहे. सीटबेल्ट न घालता वाहन चालविणाऱ्या 11 हजार 700, अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या 12 हजार, मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या चार हजार, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या साडेपाचशे, विरुध्द दिशेने वाहन चालविणाऱ्या तीन हजार 293, विमा नसलेल्या दोन हजार आणि मालवाहतूक वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहाशे वाहनांचा समावेश आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील अपघात वाढले आहेत. कोरोनामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी असतानाही अपघात आणि मृत्यूच्या संख्येत सोलापूर राज्यातील टॉपटेनमध्ये कायम आहे.

नियमांचे पालन केल्यास कारवाई होणार नाही
दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे आवश्‍यक असून अनेकदा हेल्मेटमुळे दुचाकीस्वारांचा जीव वाचला आहे. विनाहेल्मेट, विनासिटबेल्ट, ओव्हर स्पीड, मोबाईलवर बोलत वाहन चालविण्याचे प्रकार वाढले आहेत. विमा नसलेल्या वाहनांचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बेशिस्त वाहतूक रोखून अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी वाहतूक पोलिस व आरटीओतर्फे सातत्याने कारवाई केली जात आहे. 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर



रस्ता सुरक्षा समितीची बैठकच नाही
जिल्ह्यातील ज्येष्ठ खासदारांच्या अध्यक्षतेखालील रस्ता सुरक्षा समितीची दरमहा बैठक व्हायला हवी. शहर- जिल्ह्यातील अपघात कमी रोखून ब्लॅकस्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) कमी व्हावेत, यासाठी ठोस उपाययोजना या बैठकीच्या माध्यमातून केल्या जातात. दरम्यान, मार्चपासून सलग 72 दिवस कडक लॉकडाउन असतानाही जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत शहरात 37 अपघातात 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीणमध्ये 240 अपघातात 264 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी परिस्थिती असतानाही मागील काही महिन्यांपासून रस्ता सुरक्षा समितीची बैठकच झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

'10 वर्ष सिद्धार्थ माझ्याशी बोललाच नाही' अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितलं भांडणाचं कारण, म्हणाली..'कोणाच्या जाण्याची वाट बघू नये...'

Ratnagiri ZP : सभापती निवडणुकीत धक्का तंत्राचा वापर; अनपेक्षित घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलली

Latest Marathi News Live Update : बदलापुरातील 100 टक्के क्षयरोग रूग्णांना घेतलं दत्तक

SCROLL FOR NEXT