आमदार सचिन कल्याणशेट्टी sakal
सोलापूर

चुकीच्या पद्धतीने अदा केलेल्या भूसंपादन रक्कमेची चौकशी करा : कल्याणशेट्टी

लाभधारक शेतकरी बांधवांवर झालेला अन्याय दूर करून त्यांना मोबदला द्या

राजशेखर चौधरी

अक्कलकोट : अक्कलकोट विधानसभा कार्यक्षेत्रात सध्या सुरू असलेल्या सोलापूर ते कलबुर्गी रस्त्यावर आजपर्यंत ज्या शेतकरी बांधवांचे भूसंपादन झालेले आहे त्यातील एकाच गटातील असलेल्या सर्व खातेदारांना समान न्यायाने रक्कम्मा न वाटता आर्थिक देवघेव करून मर्जीतील शेतकऱ्यांनाच रक्कम देऊन अन्य लाभधारकांवर झालेला अन्याय ही गंभीर बाब असून याची त्वरित चौकशी करून त्यांनाही रक्कमा तातडीनेबअदा कराव्यात अशी जोरदार मागणी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विधानसभेत केली.

याबाबत आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना कल्याणशेट्टी म्हणाले की यापूर्वी झालेल्या भूसंपादन अन्वये एकाच गटात एकापेक्षा अधिक नावे असताना आपल्या निकटवर्तीय माणसांकरवी चेकने रक्कम स्वीकारून त्या उताऱ्यावरील इतर लोकांची हरकत व लेखी तक्रारी असतानाही फक्त आर्थिक देवघेव करून ठराविक लोकांना पैसे अदा केली गेली आहे.याबाबत यापूर्वी तक्रार केल्यानंतर व पुरावे दिल्यानंतर संबधीत अधिकारीस निलंबित करण्यात आले होते. पण आता पुन्हा कामावर घेण्यात आले आहे.सदर बाब अतिशय गंभीर असतानाही चूक दुरुस्त करून योग्य त्या सर्व व्यक्तींना मोबदला हा मिळालाच पाहिजे आणि ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून न्याय द्यावा .तसेच यासाठी योग्य ती कारवाई करावी व चौकशी समिती नेमावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी योग्य ती कारवाई करून संबधीत शेतकरी बांधवांवर झालेला अन्याय जिल्हाधिकारी यांना स्वतः लक्ष घालण्यास सांगून दूर करण्यात येईल असे सदनास आश्वाशीत केले.या संदर्भात कल्याणशेट्टी यांनी लक्षवेधी उपस्थित केल्याने ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या सर्वांना उशिरा का होईना न्याय मिळण्याच्या मार्ग मोकळा होणार आहे.

विजेचे बिल जास्त भरूनही नेहमी शेतकरी बांधवांवर अन्याय होतो

यासंदर्भात बोलताना कल्याणशेट्टी म्हणाले की अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील शेतकरी वीज बिल वसुलीस मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले असूनही त्यांच्या अडचणी मात्र कमी होत नाहीत.जसे रोहित्र संख्या वाढविणे,विजेचे साहित्य पुरविणे तसेच जोडणी तोडताना दुजाभाव करणे असे प्रकार सतत होत असतात.त्यासाठी मंत्रीमहोदयांनी लक्ष देऊन वीज बिल वसुलीच्या मनाने सेवेत असलेल्या त्रुटी दूर कराव्यात आणि शेतकरी बांधवाना दिलासा द्यावा अशी मागणी केली.याला उत्तर देताना मंत्री म्हणाले की आपल्या तालुक्यातील होणाऱ्या विजेच्या अन्याय संदर्भातील माहिती पत्राद्वारे द्यावी मी व्यक्तिशः लक्ष घालून प्रश्न मार्गी लावीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: सेन्सेक्स 718 अंकांच्या वाढीसह उघडला; बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी, तेजीचे कारण काय?

Latest Marathi News Live Updates : नांदेडमध्ये पावसाचा कहर, ५० म्हशी दगावल्या

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा ताजा भाव

'सगळ्यांनी माझं हसू केलं, पण आता...' अभिषेक बच्चनसाठी बिग बींची भावूक पोस्ट, म्हणाले...'त्या थट्टेची जागा...'

Asia Cup मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळावे की नाही? केदार जाधव म्हणतो, 'मला विश्वास आहे की...'

SCROLL FOR NEXT