सोलापूर

आव्हाड-देशमुखांमध्ये कलगीतुरा 

संतोष सिरसट

सोलापूर ः देश कोरोनासारख्या मोठ्या आजाराशी लढत आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हेच आवाहन केले आहे. मात्र, विरोधक त्याचा बाऊ करत आहेत. सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्या दिवशी पंतप्रधानांबद्दल जे वक्तव्य केले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी जनतेला भडकवण्याचे काम करू नये, असा टोला आमदार सुभाष देशमुख यांनी लगावला आहे. 

पालकमंत्री आव्हाड यांनी मोदी यांच्या दिवे लावण्याच्या वक्तव्याबद्दल मोदी हे मूर्ख आहेत असे विधान सोलापुरात केले होते. त्या वक्तव्याचा समाचार आमदार देशमुख यांनी घेतला. देशात कोरोनासारखी महामारी आल्यामुळे पंतप्रधानांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याबद्दल त्यांनी देशाची माफीही मागितली आहे. कोरोना विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. हीच भावना ठेवून पंतप्रधानांनी रविवारी (ता. 5) सर्वांना दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र, विरोधक या गोष्टीचा बाऊ करत आहेत. आज पालकमंत्री आव्हाड हे पहिल्यांदाच सोलापुरात आले आहेत. पहिल्याच दिवशी त्यांनी बेजबाबदार वक्तव्य केले आहे. जर मनात देशप्रेम असेल तर ही भाषा पालकमंत्र्यांना शोभणारी नाही. राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनीही मोदी यांच्या या आवाहनाचे स्वागत केले आहे. असे असताना आव्हाडांनी विरोध करणे म्हणजे चुकीचे असल्याचेही आमदार देशमुख यांनी सांगितले. 

आजच्या संकटाच्या काळात सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची गरज आहे. राजकीय लढाई लढण्यासाठी आम्ही व भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता खंबीर आहे. पण आता ही वेळ नाही. कोरोनाचे संकट गेल्यानंतर आपण राजकीय लढाई लढू. आता ही वेळ सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हरविण्याची आहे आहे. भाजपचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता देशाच्या सेवेसाठी आणि ज्या लोकांची उपासमार होत आहे ती थांबवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही आमदार देशमुख यांनी सांगितले. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT