kisan rail.jpg Gallery
सोलापूर

'किसान रेल्वे'ची वर्षपूर्ती! रेल्वेला मिळाले 35.82 कोटींचे उत्पन्न

'किसान रेल्वे'ची वर्षपूर्ती! रेल्वेला मिळाले 35.82 कोटींचे उत्पन्न

विजय थोरात

सोलापूर विभागातून किसान रेल्वे सेवा 21 ऑगस्ट 2020 पासून सुरू करण्यात आली होती. किसान रेल्वेच्या सोलापूर विभागातील सेवेला नुकतीच वर्षपूर्ती झाली आहे.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) प्रादुर्भावामुळे देशभरातील रेल्वेची (Indian Railway) प्रवासी वाहतूक सेवा बंद होती. त्याचा परिणाम पार्सल सेवेवरही झाला. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागले. त्यामुळे देशातील विविध भागांत नाशवंत माल आणि जीवनावश्‍यक वस्तू पोचविण्यासाठी पार्सल एक्‍स्प्रेसची (किसान रेल सेवा) (Kisan Railway) सेवा सुरू करण्यात आली. सोलापूर विभागातून देखील किसान रेल्वे सेवा 21 ऑगस्ट 2020 पासून सुरू करण्यात आली होती. किसान रेल्वेच्या सोलापूर विभागातील सेवेला नुकतीच वर्षपूर्ती झाली आहे.

सर्वप्रथम सोलापूर विभागातून पहिली पार्सल एक्‍स्प्रेस सांगोला - मनमाड - मुझफ्फरपूर किसान रेल्वे एक्‍स्प्रेस धावली. पार्सल रेल्वेला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने आणखी तीन पार्सल गाड्यांची सुरवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे. रस्ता वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतूक अतिशय जलद आणि सोयीस्कर असल्याने शेतमाल देशाच्या कानाकोपऱ्यात पोचविणे शक्‍य झाले. त्याचबरोबर किसान रेल्वेचे भाडे देखील कमी असल्याने शेतकऱ्यांना सोयीस्कर ठरले आहे. सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्ष, पेरू, बोर, सिमला मिरची, सीताफळ व अन्य शेतमाल देशभरात पोचविणाऱ्या किसान रेल्वेमुळे सांगोल्याचे नाव देशभरात झाले आहे.

सांगोला रेल्वे स्थानकावरून किसान रेल्वेस एक वर्ष पूर्ण झाले आहे.

किसान रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे सांगोला स्थानकावरून दिल्ली, कोलकता, मुझफ्फरपूर आणि शालिमार या स्थानकांवर किसान रेल्वे सुरू करण्यात आली आहे. किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. केंद्र सरकारने किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतमाल आणि फळांच्या माल वाहतूक भाड्यामध्ये 50 टक्‍के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोड वाहतुकीपेक्षा शेतमाल व फळे आता किसान रेल्वेने कमी वेळेत जात आहेत. त्याचबरोबर किसान रेल्वे पार्सल एक्‍स्प्रेस सध्या आठवड्यातील तीन दिवस धावत आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने सध्या धावत असलेली किसान रेल्वे एक्‍स्प्रेस 9 ऑगस्टपासून आठवड्यातील तीन दिवस ऐवजी चार दिवस चालविण्यात येत आहे.

सोलापूर विभागात मागील आर्थिक वर्षातील 21 ऑगस्ट-2020 मध्ये किसान रेल्वे सुरू झाली. मागील आर्थिक वर्ष 21 ऑगस्ट 2021 ते मार्च 2021 मध्ये किसान रेल्वेच्या एकूण 213 फेऱ्यात 38 हजार 451 टन शेतमालाची वाहतूक करून रुपये 17.42 कोटी उत्पन्न मिळाले. तसेच चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल 2021 ते जुलै 2021 दरम्यान किसान रेल्वेच्या 182 फेऱ्यात 40 हजार 498 टन मालाची वाहतूक करून रुपये 18.40 कोटींचे उत्पन्न झाले आहे. 21 ऑगस्ट 2020 पासून गत एका वर्षात किसान रेल्वेच्या माध्यमातून 395 फेऱ्यांत 78 हजार 949 टन मालाची वाहतूक करत रुपये 35.82 कोटीची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT