kurduvadi to daund railway stone pelting safety travel railwy police  Sakal
सोलापूर

Solapur News : रेल्वेवरील दगडफेक थांबणार कधी ?

सुरक्षित प्रवास म्हणून समजला जाणारा रेल्वे प्रवास नक्की सुरक्षित राहिला आहे का. यापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी : कुर्डुवाडी ते दौंड दरम्यान प्रवासी रेल्वे गाड्यांवर दगडफेक होण्याच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, यावर रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलिसांनी ठोस कारवाई करत वचक निर्माण करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. सुरक्षित प्रवास म्हणून समजला जाणारा रेल्वे प्रवास नक्की सुरक्षित राहिला आहे का. यापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सोलापूर ते पुणे रेल्वे स्थानकादरम्यान अनेकवेळा गाड्यांवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या घटना शक्यतो रात्रीच्या वेळी होतात. धावत्या गाडीवर किंवा रेल्वे स्थानकाजवळ थांबलेल्या गाड्यांवर होते. प्रवासी अनेकवेळा त्याबाबत लेखी तक्रार देखील करत नाहीत.

४ नोव्हेंबर रोजी मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली. २८ ऑक्टोबर रोजी मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसवर वाशीम येथे दगडफेक झाली. १६ सप्टेंबर रोजी मुंबईहून सोलापूरला येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर जिंती रोड येथे दगडफेक झाली.

सुदैवाने यामध्ये प्रवाशांना दुखापत झाली नाही. परंतु यापूर्वी झालेल्या घटनांमध्ये काही वेळा प्रवाशांना दुखापत झाली आहे. सोलापूर-पुणे या दरम्यान रेल्वेने प्रवास करणारे खूप प्रवासी आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर, अक्कलकोट, बार्शी, कुर्डुवाडी, जेऊर, माढा, वैराग, मोडनिंब या भागातील अनेकजण प्रवास करतात.

त्याचबरोबर या मार्गावरून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या धावत असल्याने परराज्यातील अनेक प्रवासी असतात. या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. यावर ठोस उपाय करणे गरजेचे असून, रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल आणि स्थानिक लोक यांनी समन्वय साधत उपाययोजना केल्यास या घटना टळतील.

रेल्वे गाडीवर होत असलेल्या दगडफेकीच्या घटनांमुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. कुटुंबाबरोबर रात्रीच्या वेळी रेल्वेचा प्रवास सुरक्षित मानला जातो. मात्र अशा घटना वारंवार घडत आहेत. रेल्वे सुरक्षा बल कर्मचाऱ्यांनी यावर तत्काळ ठोस उपाययोजना करावी.

-संजय टोणपे, अध्यक्ष सोलापूर पुणे प्रवासी संघटना कुर्डुवाडी.

अशा घटना घडल्याच्या तक्रारी आल्या नाहीत. जर रेल्वे गाड्यांवर दगडफेक झाली तर लगेच प्रवाशांनी रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा यांना लगेच माहिती द्यावी, तत्काळ त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल.

- दत्ता देसाई, पोलिस निरीक्षक, कुर्डुवाडी रेल्वे पोलिस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT