... अन्यथा 'सिद्धेश्‍वर'च्या चिमणी पाडकामाला मिळू शकते दोन महिन्यांची मुदत! Sakal
सोलापूर

महापालिकेचे मक्तेदाराला पत्र! मुदत देऊनही कारखाना शांतच, चिमणी पाडकामाच्या तयारीचे मक्तेदाराला आदेश

चिमणी पाडण्यासाठी महापालिकेने कारखाना प्रशासनाला ४५ दिवसांची मुदत दिली. ११ जूनला मुदत संपणार असून ३२ दिवसांत कारखान्याने कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसत नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मक्तेदाराला चिमणी पाडकामाची तयारी सुरु करावी, असे पत्र पाठवले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची अवैध चिमणी स्वत:हून पाडण्यासाठी महापालिकेने कारखाना प्रशासनाला ४५ दिवसांची मुदत दिली आहे. ११ जून रोजी ही मुदत संपुष्टात येणार असून मागील ३२ दिवसांत कारखान्याने त्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसत नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेने हैदराबादच्या मक्तेदाराला चिमणी पाडकामाची तयारी सुरु करावी, असे पत्र पाठवले आहे.

केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत सोलापूरचा समावेश पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात देखील आहे. परंतु, जून २०१६ पासून अजूनही या योजनेअंतर्गत एकही विमान सोलापूर विमानतळावरून उडू शकलेले नाही. होटगी रोड विमानतळ परिसरातील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या को-जनरेशनची चिमणी विमानसेवेला प्रमुख अडथळा असल्याचे अनेकदा महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

पण, शेतकऱ्यांच्या पैसातून उभारलेली चिमणी बचावासाठी कारखान्याने अनेक वर्षे न्यायालयीन लढा लढला. आता महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कारखान्याला पत्र काढत ४५ दिवसांची मुदत दिली आहे. ११ जूनला ही मुदत संपुष्टात येणार आहे, त्या काळात कारखान्याने स्वत:हून चिमणी काढून न घेतल्यास महापालिका मक्तेदाराच्या माध्यमातून चिमणी हटवणार आहे. त्याअनुषंगाने आता महापालिकेने चिमणी पाडकामाच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे.

ठळक बाबी...

  • - दिनायस कॉन्ट्रक्ट प्रा. लि. या हैदराबाद येथील कंपनीला १.१७ कोटीला चिमणी पाडकामाचे टेंडर

  • - कारखान्याला चिमणी पाडकासाठी दिलेली मुदत ११ जूनला संपणार असून १० जूनपर्यंत आपण यंत्रणा तयार ठेवावी

  • - ११ जूनला मुदत संपल्यानंतर कारखान्याची चिमणी पाडकामाची प्रक्रिया मक्तेदाराने सुरु करावी

  • - आवश्यकता भासल्यास कारखाना परिसरात तैनात केला जाणार पोलिसांचा मोठा बंदोबस्त

चिमणी पाडून आर्थिक गुलामगिरीतुन सुटका करा
श्री सिध्देश्वर साखर कारखान्याच्या को-जनरेशनची अनधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकामाविषयी कारखाना प्रशासन इच्छुक नाही. नेहमीप्रमाणे कारखान्यातील कामगार, लहान मुले, महिला, वृद्धांना पुढे करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची पुनवृत्ती होण्याची शक्यता सोलापूर विकास मंचने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनने केंद्राकडून पाच हजार सशस्त्र निमलष्करी दलाचा फौजफाटा तैनात ठेऊन सोलापूरच्या विकासात प्रमुख अडथळा असलेली चिमणी पाडावी आणि सोलापूरकरांची आर्थिक गुलामगिरीतुन सुटका करावी, अशी मागणी सोलापूर विकास मंचने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे यांच्याकडे केली आहे. यावेळी विकास मंचचे सदस्य केतन शहा, गणेश पेनगोंडा, गणेश शिलेदार, विजय जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT