rekha thakur vba 
सोलापूर

'वंचित'च्या रेखा ठाकूर म्हणाल्या...सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात करावा ठराव

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : केंद्र सरकारने संपूर्ण देशात 'सीएए', 'एनआरसी' व 'एनपीआर' लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे समाजातील वंचित घटकांचे नुकसान होणार असून महाविकास आघाडी सरकारने केरळ, राजस्थान, पंजाबच्या धर्तीवर विधानसभेत या सुधारित नागरिकत्त्व कायद्याविरुध्द ठराव करावा, अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्या राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सोलापुरात केली.

हेही नक्‍की वाचा : भाजपचे खासदार डॉ. महास्वामी यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द
 

13 मार्च रोजी औरंगाबाद येथे भटक्‍या विमुक्‍त जमातींसाठी परिषद
राज्यात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर महिला व मुलींवरील अत्याचारात वाढ झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेला राज्यात पोषक वातावरण दिसत नाही. गुन्हेगारांना पायबंद घालणे आणि सामाजिक व सांस्कृतिक पार्श्‍वभूमी पाहून ठोस नियोजन करण्याची गरज आहे. हिंगणघाट, सोलापूर, देऊळगाव राजा, औरंगाबाद याठिकाणी महिलांवर अत्याचार झाले आहेत. अशीच परिस्थिती राज्यभरात राहिल्यास गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, असा इशाराही ठाकूर यांनी या वेळी दिला. दरम्यान, सुधारित भारतीय नागरिकत्त्व कायद्याविरुध्द 4 मार्चला दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली धरणे आंदोलन केले जाणार आहे. सुधारित नागरिकत्त्व कायद्याच्या जनजागृतीसाठी 13 मार्च रोजी औरंगाबाद येथे भटक्‍या विमुक्‍त जमातींसाठी परिषद आयोजित केल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी प्रदेश प्रवक्‍ते आनंद चंदनशिवे, राज्य कार्यकारणी सदस्या अंजना गायकवाड, शहराध्यक्षा रेश्‍मा मुल्ला, नगरसेविका ज्योती बमगोंडे, नगरसेवक गणेश पुजारी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बनसोडे, विक्रांत गायकवाड आदी उपस्थित होते.


हेही नक्‍की वाचा : विद्यार्थ्यांसाठी गूड न्यूज ! नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयीन निवडणुका


कॉंग्रेस अन्‌ राष्ट्रवादी कॉंग्रेसने भूमिका स्पष्ट करावी
केंद्र सरकारने संपूर्ण देशात 'सीएए', 'एनआरसी' व 'एनपीआर' लागू करण्याचा निर्णय घेतला, परंतु हे कायदे नेमके काय आहेत, त्याचा फटका कोणाला बसणार आहे याची माहिती अनेकांना नाही. या पार्श्‍वभूमीवर राज्यभर प्रशिक्षकांच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केल्याची माहिती रेखा ठाकूर यांनी दिली. दरम्यान, महाविकास आघाडीत ताळमेळ नसून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुधारित नागरिकत्त्व कायद्याबद्दलची भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही त्यांनी केले.


हेही नक्‍की वाचा : बापरे ! बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT