सोलापूर

Crop Insurance : पाहणी न करता तक्रार निकाली, विमा कंपनीचा प्रताप

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा - प्रधानमंत्री फसल बीमा योजनेत ऑनलाईन तक्रार केलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीची पडताळणी न करता विमा कंपनीने परस्पर तक्रारी निकाली काढल्यामुळे शेतकऱ्यातून विमा कंपनीच्या मनमानी कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या खरीप हंगामातील सन 2022 च्या हंगामात मंगळवेढा तालुक्यातील जवळपास 18 हजार शेतकऱ्यांनी बाजरी, तूर, मका, कांदा या पिकाचा अँग्री इन्शुरन्स कंपनी कडे विमा भरला. त्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात जवळपास आठ हजार शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची कल्पना ऑनलाईन दिली होती त्यातील 4 हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात चार कोटीची भरपाई दिली होती.

परंतु 12 डिसेंबर 2022 रोजी मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील काही गावात झालेल्या पावसामुळे तूर पिकाचे नुकसान झाले होते. याबाबतची तक्रार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नुकसानीच्या घटनेपासून 72 तासाच्या आत केली होती. त्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी न करता त्या तक्रारीची पाहणी न करता परस्पर पाऊस झाला नाही. असे निश्चित करून परस्पर निकाली काढल्या यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. वास्तविक पाहता ऑनलाईन तक्रार करत असताना त्या अँड्रॉइड मोबाईल मधून त्या जागेचे लोकेशन, पीक नुकसानीचा फोटो, तारीख आणि नुकसानीचे कारण देत भक्कम पुरावे जोडले जातात.

तरीही या तक्रारीची पाहणी करण्यास विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी आला नाही. याबाबत चौकशी न करता विमा कंपनीने पाऊस झाला नसल्याचे सांगत सदरच्या तक्रारी निकाली काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. वास्तविक पाहता ऑनलाईन तक्रार मध्ये पीक नुकसानाचे फोटो आणि लोकेशन दिले असताना पाऊस झाला नाही. असा निष्कर्ष विमा कंपनीने कुणाच्या आधारावर काढला असा सवाल या भागातून शेतकऱ्यातून व्यक्त केला जात आहे. विमा कंपनीच्या या फसवणुकीबद्दल योग्य ती कारवाई शासनाने करावी अशी मागणी होत आहे.

ऑनलाइन तक्रार केलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना तहसीलदारांनी घेतलेल्या बैठकीत दिल्या होत्या. परंतु जर विमा कंपनीने तक्रारीची पाहणी केली नसेल तर लेखी तक्रार द्यावी सदरची तक्रार वरिष्ठ कार्यालयाकडे वर्ग करण्यात येईल.

- गणेश श्रीखंडे, तालुका कृषी अधिकारी मंगळवेढा.

3 डिसेंबर रोजी झालेल्या नुकसानीची तक्रार ऑनलाईन केली होती विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी सदर तक्रारीची पाहणी करण्यास आला नाही. पंचनामा न करता जर परस्पर तक्रार निकाली काढली असेल तर विमा कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

- तात्या काटकर, शेतकरी, भाळवणी

72 तासाच्या आत तक्रार करून विमा कंपनीने जर पाहणी केली नसेल तर या प्रश्नी लक्ष घालून बाधीत शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.

- आ. समाधान आवताडे, पंढरपूर-मंगळवेढा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT