सोलापूर

Mangalwedha : जमिनीमध्ये पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये; तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे

कृषी दिनानिमित्त कृषी विभाग व पंचायत समिती मंगळवेढा यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृह येथे कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताह समारोप दिन उत्साहात संपन्न झाला.

हुकुम मुलाणी

Mangalwedha - यंदाच्या खरीप हंगामात योग्य नियोजन केले होते मात्र पाऊस लांबल्यामुळे जमिनीमध्ये पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी केले.

कृषी दिनानिमित्त कृषी विभाग व पंचायत समिती मंगळवेढा यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृह येथे कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताह समारोप दिन उत्साहात संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कृषी अधिकारी विनायक तवटे, बाळासाहेब बाबर, अश्विनी शिंत्रे, बालाजी टेकाळे,कृषी विस्ताराधिकारी मधुकिरण डोरले, तसेच सर्व कृषी पर्यवेक्षक , सर्व कृषी सहाय्यक व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.

तत्पुर्वी कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमे पूजन करण्यात आले.त्यानंतर कृषी अधिकारी पंचायत समिती बाळासाहेब बाबर व कृषी पर्यवेक्षक अमोल भोरकडे यांनी कै वसंतराव नाईक यांचा जीवनपट सांगत केलेले कार्याबद्दल माहिती दिली. कृषी अधिकारी अश्विनी शिंत्रे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.

मंडळ कृषी अधिकारी बालाजी टेकाळे यांनी खरीप हंगामातील पीक लागवड तंत्रज्ञान बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक मंगेश लासुरकर यांनी वसंतराव नाईक यांच्या कृषी विषयक कार्याबद्दल माहिती दिली.

कृषीसहाय्यक प्रशांत काटे यांनी बीज प्रक्रिया, हुमणी नियंत्रण प्रात्यक्षिक, बियाणे उगवण क्षमता चाचणी ,व लागवड तंत्र पंचसूत्री बाबत मार्गदर्शन केले.राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकरी विश्वनाथ पाटील यांनी कृषी विभागाच्या सल्ला व मार्गदर्शनानुसारच तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे मी अधिक उत्पादन घेऊ शकलो असे मत व्यक्त केले.

तालुका शेतकरी सल्ला समिती सदस्य संगमेश्वर केदार यांनी कृषी विभागाच्या मदतीने शेतकऱ्यांनीं नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली. राज्यस्तर पुरस्कार प्राप्त विश्वनाथ पाटील (मुंडेवाडी),भारत मुंगसे(बोराळे), तसेच जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकरी सिद्धेश्वर मेटकरी (पाटकळ),रमेश कमते(सोड्डी),भगवान गावडे(उचेठाण) तसेच तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त नवनाथ सुरकुंडे,विमल चौगुले(खडकी),

ज्ञानेश्वर गरंडे(नंदेश्वर),दत्तात्रय व्हणुटगी(सिद्धापूर),गजानन पाटील (धर्मगाव) त्याबरोबरच महिला शेतकरी साधना भिसे (हजापूर)तसेच जिल्हा शेतकरी सल्ला समिती सदस्य जनार्दन कोंडूभैरी, तालुका शेतकरी सल्ला समितीचे संगमेश्वर केदार, पत्रकार दत्तात्रय नवत्रे त्याचबरोबर कृषी विभागांमध्ये कार्यरत असलेले उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचारी आदींचा सन्मान करण्यात आला.तालुका कृषी अधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले प्रास्ताविक विनायक तवटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत काटे यांनी तर आभार विक्रम सावजी यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

SCROLL FOR NEXT