ujani dam 
सोलापूर

रब्बीत एक, तर उन्हाळ्यात शेतीला मिळणार दोनदा पाणी ! कालवा सल्लागार समितीपुढे प्रस्ताव

तात्या लांडगे

सोलापूर : दरवर्षी रब्बी हंगामासाठी दोन, तर उन्हाळ्यात उजनी धरणातून एक आवर्तन सोडले जात होते. मात्र, रब्बीच्या तुलनेत उन्हाळ्यात पाण्याची मोठी गरज भासत असल्याने जलसंपदा विभागाने पूर्वीच्या नियोजनात आता मोठा बदल केला आहे. शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामात एक, तर उन्हाळ्यात दोन आवर्तने मिळणार आहेत. तसा प्रस्ताव पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी तयार केला असून, आता त्यावर कालवा सल्लागार समितीत शिक्‍कामोर्तब होणार आहे.

कालवा सल्लगार समितीत अंतिम निर्णय
रब्बी हंगामाच्या तुलनेत उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्याची खूप गरज भासते. गतवर्षी प्रायोगिक तत्त्वावर उन्हाळ्यात दोन आवर्तने, तर रब्बी हंगामात एक आवर्तन सोडले. हा प्रयोग यशस्वी झाल्याने आता तसा प्रस्ताव कालवा सल्लगार समितीपुढे ठेवला जाईल.
-धीरज साळे, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे, सोलापूर

जिल्ह्यातील रब्बी क्षेत्रात मोठी घट झाली असून, रब्बीच्या तुलनेत शेतकऱ्यांकडून उन्हाळ्यातच पाण्याची अधिक मागणी होऊ लागली आहे. पावसाळा नुकताच संपल्याने मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने साधारणपणे डिसेंबरपर्यंत पाणीटंचाई भासत नसल्याचेही निदर्शनास आले. रब्बी हंगामात दोन आवर्तने सोडूनही शेतकऱ्यांकडून उन्हाळ्यात दोन आवर्तनाची मागणी केली जात होती. दरम्यान, पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ होत असून, ज्वारीच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाल्याचे चित्र आहे. हंगामी पिकांकडेही शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडण्याच्या दृष्टीने गतवर्षीही नियोजन करण्यात आले होते. तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हा बदल आता कायमस्वरुपी ठेवला जाणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत कालवा सल्लागार समितीची बैठक होणार असून त्यावेळी रब्बीचे पहिले आवर्तन सोडण्यासंबंधीचाही निर्णय होणार आहे.

'उजनी'ची सद्यस्थिती

  • एकूण टक्‍केवारी
  • 110.02 टक्‍के
  • एकूण पाणीसाठा
  • 122.60 टीएमसी
  • उपयुक्‍त पाणीसाठा
  • 58.94 टीएमसी
  • एका आवर्तनातून मिळणारे पाणी
  • 10 ते 12 टीएमसी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT