लस घेतली अन्‌ अँटिजेन टेस्ट केली तरी कर्नाटकमध्ये नो एंट्री ! Canva
सोलापूर

लस घेतली अन्‌ अँटिजेन टेस्ट केली तरी कर्नाटकमध्ये नो एंट्री !

लस घेतली अन्‌ अँटिजेन टेस्ट केली तरी कर्नाटकमध्ये नो एंट्री !

राजशेखर चौधरी

महाराष्ट्र व कर्नाटक सीमा लागून असल्याने वागदरी, बळोरगी, मादन हिप्परगा, बोरोटी (माशाळ) सीमेवरून दररोज हजारो लोक ये- जा करतात.

अक्कलकोट (सोलापूर) : महाराष्ट्र राज्यातून (Maharashtra State) कर्नाटक राज्यात (Karnataka State) असलेल्या कलबुर्गी जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी हिरोळी सीमेवर बंदोबस्तास असलेले कर्नाटकचे पोलिस (Karnataka Police) हे प्रवाशांजवळ असलेले रॅपिड अँटिजेन टेस्ट प्रमाणपत्र व त्यांनी घेतलेले एक किंवा दोन्ही लसी काहीच कामाचे नाहीत असे स्पष्ट करीत आहेत. प्रवासी वर्गाकडे कोरोनाचे (Covid-19) फक्त आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र नसेल तर कर्नाटक हद्दीत प्रवेश मिळणार नाही, अशी अट घालत प्रवेश नाकारत असल्याने प्रवासी वर्गात मोठी नाराजी पसरली आहे. अत्यंत तातडीच्या कामांसाठी सुद्धा प्रवेश मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे.

अक्कलकोट तालुक्‍यातील (Akkalkot Taluka, Solapur) गावांचे कर्नाटकशी शेती, नोकरी, कौटुंबिक नातेसंबंध व सामाजिक ऋणानुबंध गेली कित्येक वर्षे कायम आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक सीमा लागून असल्याने वागदरी, बळोरगी, मादन हिप्परगा, बोरोटी (माशाळ) सीमेवरून दररोज हजारो लोक ये- जा करतात आणि आता अचानक सीमा बंद करण्यात आली आहे. गुब्याड व हिंगणे या ठिकाणी तर पूर्ण रस्ते जेसीबी लावून बंद केले गेले आहेत. आता लोकांना आरटीपीसीआर सक्ती केली जाते. तसे न करता लस घेतलेल्यांना तसेच रॅपिड अँटिजेन प्रमाणपत्र सोबत असणाऱ्यांना सोडावे, असे प्रवाशांचे मत आहे. पण या ठिकाणी अडवून जाणूनबुजून थांबवून घेतले जाते आणि शेवटी पैसे देवाण- घेवाण होऊन गाड्या सोडल्या जातात, असे अनेक प्रवासी आपले मत व्यक्त करीत आहेत. आपल्याकडे आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर पाच- सहा दिवस रिपोर्ट येत नाही आणि अचानक आजारी व अन्य कारणाने कर्नाटक हद्दीत नातेवाइकांकडे जायचे झाल्यास काय करावे, हा प्रश्न सध्या उभा राहात आहे.

बसमध्ये आलात तर कोरोना नाही पण स्वतःच्या चारचाकीत कोरोना नक्की होणार!

गेल्या अनेक दिवसांपासून कलबुर्गीहून बस गाड्या हिरोळी सीमेपर्यंत येत आहेत. त्यातून प्रवासी खाली उतरतात व ते चालत तीनशे फूट पुढे महाराष्ट्र हद्दीत येऊन इकडच्या बाजूस उभे असलेल्या वागदरी सीमेवरील महाराष्ट्र बसमध्ये चढून अक्कलकोटकडे येतात. विनोदाचा भाग म्हणजे, त्या बसमध्ये प्रवास करणाऱ्यांकडे कोणतेही कोरोना प्रमाणपत्र नसते तरी ते चालते. तसेच मादनहिप्परगा सीमेवरून बस गाड्या महाराष्ट्रात बिनधास्त येतात पण बाकीच्या सीमेवर बंदी केली जाते. यात सोलापूर प्रशासनाने कलबुर्गी प्रशासनाशी चर्चा करून हा प्रश्नी मार्ग लावावा, अशी प्रवाशांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT