Police action
Police action 
सोलापूर

मास्क न घालणाऱ्यांना पोलिसांकडून "एवढा' दंड; दोन दिवसांत साडेदहा लाख रुपये वसूल ! 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग चिंताजनक असल्याने ग्रामीण पोलिसांनी आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन दिवसांत जिल्ह्यातील 25 पोलिस ठाण्याअंतर्गत पाच हजार 63 जणांवर कारवाई करीत पोलिसांनी तब्बल 10 लाख 49 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बेशिस्त नागरिकांना स्वयंशिस्त लागावी या हेतूने नवे आदेश काढून दंडात्मक कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी 6 व 7 जून या दोन दिवसांतच तब्बल साडेदहा लाखांचा दंड वसूल केला आहे. त्यामध्ये मास्क न घालणाऱ्या तीन हजार 518, डबलसीट दुचाकीस्वार एक हजार दोन, दुचाकीवर तिघे असलेल्या 92 जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तसेच तीनचाकी व चारचाकी वाहनात अधिक प्रवासी असलेल्या 170 वाहनचालकांना, दिलेल्या वेळेपेक्षाही अधिक वेळ दुकान सुरू ठेवणाऱ्या 22 दुकानदारांना, दुकानासमोर पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती थांबविल्याप्रकरणी 48 दुकानदारांना, सार्वजनिक ठिकाणी थुंकलेल्या 90 व्यक्‍तींना, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या 47 व्यक्‍तींना, सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू खाणाऱ्या 74 जणांना पोलिसांनी दंड केला आहे. 

ग्रामीण पोलिसांनी "अशी' केली कारवाई 

  • मास्क न घालणाऱ्यांना दंड : 3,50,900 रुपये 
  • डबलसीट दुचाकीस्वार : 4,89,900 रुपये 
  • तीन-चारचाकी वाहनांना दंड : 91,900 रुपये 
  • दुकानदारांकडून वेळेचे उल्लंघन : 22,000 रुपये 
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी : 17,000 रुपये 
  • सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, दारू सेवन : 18,100 रुपये 
  • सोशल डिस्टन्सिंगचे पालन नाही : 30,100 रुपये 

नागरिकांना स्वयंशिस्त लागावी म्हणून कारवाई 
मास्क न घालणे, दुचाकीवरून डबलसीट प्रवास करणे, तीन-चारचाकीतून दोनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणे, दुकानांना दिलेल्या वेळेचे पालन न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मद्यपान करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे आणि दुकानांसमोर पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती थांबवून ठेवल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. कोरोनाचा संसर्ग खंडित करून हा विषाणू हद्दपार करण्यासाठी नागरिकांना स्वयंशिस्त लागावी, या हेतूने ही कारवाई केली जात असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक (ग्रामीण) अतुल झेंड यांनी दिली. 

हेल्मेटचा वापर दुचाकीस्वारांना बंधनकारक 
राष्ट्रीय तथा राज्य मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र, महामार्गावरून प्रवास करणाऱ्या दोन टक्‍केदेखील दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसल्याची स्थिती पाहायला मिळते. आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एकमेकांच्या संपर्कातून संसर्ग होऊ नये म्हणून हेल्मेटची गरज आहे. तर दुसरीकडे अपघातातून बचाव होण्यासाठीही त्याची गरज आहे. त्यामुळे आता दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे, असे आवाहन करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT