Seven people died, Just what the pits do 
सोलापूर

सात जणांचे जीव गेलेत, नुसते खड्डे काय बुजवता

संतोष कानगुडे

पानगाव (जि. सोलापूर) : बार्शी-सोलापूर राज्यमार्गावरील राळेरास ते शेळगाव (आर) दरम्यान महाशिवरात्री (ता. 21) दिवशी बस व क्रूझर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्वांच्याच टीकेचे लक्ष बनलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन दिवसांनंतर वैराग-पानगाव-बार्शी या रस्त्यावरील लहान-मोठे खड्डे ठेकेदाराकडून बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या हे काम सुरू आहे. मात्र, नागरिक प्रशासनाच्या नुसतेच खड्डे बुजवण्यावरून संतप्त झाले असून सात जणांचा जीव गेला आहे, नुसते खड्डे काय बुजवता, संपूर्ण रस्त्याचे काम चांगले करा अशी तीव्र भावना भावना व्यक्त करत आहेत. 

या खराब रस्त्यामुळे खड्डे चुकविताना केवळ लहानच नव्हे तर मोठी वाहनेदेखील अपघाताची शिकार होत असल्याचे गत एक महिन्यापासून दिसून येत आहे. अनेक दुचाकीस्वार या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातग्रस्त झाले असून यातील कोणी जीवाला मुकले आहे तर कोणी कायमचे दिव्यांग झाले आहे. शुक्रवारच्या (ता. 21) अपघातामुळे तर संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून या अपघातातील मृत्यूची आता संख्या सातवर गेली आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्या चालू असलेल्या रस्त्याच्या डागडुजीवर नागरिक समाधानी नसून आता सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम करावे अन्यथा ठिकठिकाणचे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 


कामाबाबत ठोस कार्यवाहीच नाही 
बार्शी-सोलापूर रस्ता मोठा होणार असल्याचे ऐकून-ऐकून कंटाळा आला. कधी होणार याबाबत काही ठोस कार्यवाही दिसून येत नाही. पण खड्डे बुजवण्यापेक्षा लवकरात लवकर रस्ताच करण्यात यावा. 
- डॉ. शंकर भोसले, कळंबवाडी (पा), ता. बार्शी 

अनेक घरातील कर्ते पुरुष गेले 
बार्शी-सोलापूर मार्गावर खड्ड्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेकांना विशेषकरून घरातील कर्त्या युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांची मोठी कौटुंबिक हानी झालेली आहे. अशा बाबींचा विचार करून शासनाने त्वरित यावर कार्यवाही करून रस्त्याचे काम हाती घ्यावे. 
- अंकुश भिसे, सदस्य, ग्राम सुरक्षा समिती, पानगाव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

पंचनाम्याचे निकष शेतकऱ्यांच्या जिव्हारी! अतिवृष्टीच्या भरपाईसाठी ‘हे’ निकष अडचणीचे; ॲग्रीस्टॅक क्रमांक, ई-पीक पाहणी नोंदीचा अडथळा; शेतातील जिओ टॅगिंग फोटोचीही अट

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

SCROLL FOR NEXT