Vitthal_Rukmini Mandir 
सोलापूर

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार; मंदिर समितीचा निर्णय

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी 17 मार्चपासून बंद असलेले येथील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर आता 30 सप्टेंबरपर्यत बंदच ठेवण्याचा निर्णय आज श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने घेतला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली. 

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी दक्षता म्हणून 17 मार्चपासून मंदिर समितीने भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवले आहे. दरम्यान, परवा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तर काल विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते.

तथापि, राज्य शासनाने राज्यातील लॉकडाउन वाढवून सर्व धार्मिक स्थळे 30 सप्टेंबरपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर देखील 30 सप्टेंबरपर्यत भाविकांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. मात्र "श्रीं'चे नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवण्यात येत आहेत. इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. मंदिर समितीच्या सर्व सदस्यांशी विचारविनिमय करून समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी या संदर्भात पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Winter Update : राज्यातील थंडी गायब की गारठा कायम राहणार? हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर

PIFF Mahotsav : ‘पिफ’ १५ जानेवारीपासून रंगणार; सुमारे १४० चित्रपट दाखविले जाणार

होता स्‍कार्फ म्‍हणून वाचला गळा! 'बिबट्याचा वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला; गवतातून झडप, जिवाच्या आकांताने आरडाओरडा अन्..

सोलापूर जिल्ह्यात 2 वर्षात 1350 जणांचा अपघाती मृत्यू! दुपारी 4 ते रात्री 12 या वेळेत सर्वाधिक अपघात; ‘या’ 5 महिन्यात अपघाताचे प्रमाण जास्त

लाडक्या बहिणींना ‘ई-केवायसी’साठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत! महापालिकेत लाडक्या बहिणींचे मतदान आपल्यालाच मिळावे म्हणून भावी नगरसेवकांकडून मोफत ‘ई-केवायसी’ शिबिरे

SCROLL FOR NEXT