सोलापूर

जनता मरणाच्या दारात, सरकार मात्र आपल्या घरात

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्यातील जनता मरणाच्या दारात उभी असताना  उद्धव सरकार मात्र आपल्या घरातच व्यस्त आहे. त्यामुळे आज भाजपच्या वतीने आपले घर हेच रणांगणच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. 

शहर जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. सोशल डिस्टन्स इन राखत सरकारने कोरोना च्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करतात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्यासह सर्व आमदार व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. 

महाभकास आघाडीचा ढिसाळपणा, चालढकलपणा, कठोर निर्णय घेण्यात अपयश, 40 हजाराकडे आगेकूच करणारी रुग्णसंख्या, मुंबईत २५ हजारांचा गाठलेला रुग्ण पल्ला, तळमळत असणारी जनता, मृतांच्या आई- बापाची वेदना, नातेवाईकांचा आक्रोश, उपचारा अभावी होणारी रुग्णांची हेळसांड, बेड्सची कमतरता, पोलिसांवरील हल्ले, पळून जाणारे रुग्ण, रुग्णांना निकृष्ट दर्जाचे अन्न, त्यात सुरू असलेला भ्रष्टाचार, पोलिस, प्रशासन आणि शासन या समन्वयाचा अभाव, मृत्यूच्या खाईत लोटला जाणारा महाराष्ट्र आणि झोपलेलं सरकार, यांना जागे करण्यासाठी  महाराष्ट्र बचाव आंदोलन  करण्यात आले.  भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत आपल्या घरासमोर आंदोलन केले. 

कोरोनाविषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे राज्य सरकारचा निषेध करून, सरकारला जाब विचारण्यासाठी लॉकडाऊनचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून  भाजपच्या वतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT