suger factory sakal
सोलापूर

Solapur News :उच्चांकी दरासह दिवाळीसाठी ५० रुपयांचा हप्ता

ॲड. बी. बी. जाधव; ‘जकराया’च्या गाळप हंगामास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

बेगमपूर - जकराया साखर कारखाना यंदाच्या गळीत हंगामासाठी जिल्ह्यात उच्चांकी दराबरोबरच मागील वर्षीच्या गळीत हंगामातील उसाला दिवाळी सणासाठी प्रतिटन ५० रुपये देणार असल्याचे कारखान्याचे संस्थापक- अध्यक्ष अॅड. बी. बी. जाधव यांनी वटवटे (ता. मोहोळ) येथे जाहीर केले.

येथील जकराया साखर कारखान्याच्या तेराव्या गळीत हंगामाचा प्रारंभ व बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे सभासद डॉ. विष्णू गोडसे, त्यांच्या पत्नी राधा गोडसे आणि तज्ज्ञ संचालक राहुल जाधव व प्रियांका जाधव यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. यावेळी उमादेवी जाधव, कळंब येथील नॅचरल शुगरचे संचालक कृषिभूषण पांडुरंग आवाड, माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर, जकरायाचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, पूर्णवेळ संचालक राहुल जाधव, प्रगतशील बागायतदार प्रभाकर पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी, माजी सरपंच रफिक पटेल, रामचंद्र पतंगे आदी उपस्थित होते.

यावेळी अॅड. जाधव म्हणाले, जकरायाकडून मागील हंगामासाठी तालुक्यात सर्वाधिक २३५० रुपये दर दिला आहे. यंदाही हीच परंपरा कायम राखणार असून, शेतकऱ्यांनी जकरायाला जास्तीत जास्त ऊस द्यावा.

यावेळी कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चार लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट

यावर्षीच्या हंगामासाठी २०० ट्रॅक्टर, ३०० बैलगाडी, दीडशे डंपिंग ट्रॅक्टरचे करार करण्यात आले असून, यंदा कारखान्याने चार लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणा कार्यरत ठेवल्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Winter Update : राज्यातील थंडी गायब की गारठा कायम राहणार? हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर

PIFF Mahotsav : ‘पिफ’ १५ जानेवारीपासून रंगणार; सुमारे १४० चित्रपट दाखविले जाणार

होता स्‍कार्फ म्‍हणून वाचला गळा! 'बिबट्याचा वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला; गवतातून झडप, जिवाच्या आकांताने आरडाओरडा अन्..

सोलापूर जिल्ह्यात 2 वर्षात 1350 जणांचा अपघाती मृत्यू! दुपारी 4 ते रात्री 12 या वेळेत सर्वाधिक अपघात; ‘या’ 5 महिन्यात अपघाताचे प्रमाण जास्त

लाडक्या बहिणींना ‘ई-केवायसी’साठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत! महापालिकेत लाडक्या बहिणींचे मतदान आपल्यालाच मिळावे म्हणून भावी नगरसेवकांकडून मोफत ‘ई-केवायसी’ शिबिरे

SCROLL FOR NEXT