sarpanch. 
सोलापूर

सरपंच व्हायचंय... तर किमान सातवी पासचे सर्टिफिकेट दाखवा ! निवडणूक आयोगाच्या आदेशाने अंगठेबहाद्दरांची गोची 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : राज्यात सत्ता स्थापनेसाठी झालेल्या महाविकास आघाडी प्रयोगामुळे आता गावगाड्यात देखील आपली सत्ता असावी, यासाठी अनेक हौशे, नवसे, गौसे कंबर कसत असल्याचे चित्र असले तरी, आता गावगाड्याच्या कारभारासाठी सातवी पासची अट घालत अंगठोबहाद्दरांना गावाचा कारभारी होण्यापासून वंचित ठेवण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून ग्रामपंचायतीची तयारी करत असलेल्या अंगठेबहाद्दरांची गोची होणार आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी एक परिपत्रक जारी करून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले आहेत. 

सध्या राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा आखाडा ऐन कडाक्‍याच्या थंडीत सुरू झाला आहे. सरपंचपद थेट जनतेतून निवडण्याचा भाजप सरकारचा निर्णय रद्दबातल ठरवत, निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवडण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्यामुळे ग्रामपंचायतीवर आपल्या गटाची सत्ता असावी, यासाठी गावगाड्यातील नेत्यांनी कंबर कसली असतानाच सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी निश्‍चित नसल्यामुळे काहींनी यातून काढता पाय घेतला. तर शासनाने सरपंचपदाचे आरक्षण सोडत सदस्याच्या निवडीनंतर 25 जानेवारीला घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता गावगाड्यात सत्ता स्थापन करण्यासाठी आर्थिक भार सोसूनही सरपंचपदाची संधी न मिळाल्यास अनेकांची गोची होणार आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या शर्यतीचा उत्साह कमी झाला आहे. 

बहुसंख्य ठिकाणी लोकप्रतिनिधींनी बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी लाखोंची खैरात जाहीर केली; पण बिनविरोधचा प्रयत्न होताना दिसत नसल्याने महाविकास आघाडीचा प्रयोग गावगाड्यात सुरू झाला. सरपंच आरक्षणाच्या घोळात उत्साह कमी झाला असला तरी सदस्य होण्यासाठी देखील चढाओढ लागली आहे. त्यामुळे काल प्रसिद्ध केलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार सदस्य होण्यासाठी 21 वर्षे वय पूर्ण झालेल्या उमेदवाराला यासाठी अर्ज दाखल करताना सदस्यांमधून सरपंच होत असताना त्याचे शिक्षण किमान सातवी पास असणे आवश्‍यक करण्यात आले आहे. अशिक्षित सरपंचाचा लाभ घेत अनेक गैरप्रकार करण्यातची संधी मिळाल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. तर आरक्षणामुळे स्वतःऐवजी पत्नी, बहीण, भावजय, आई यांच्या माध्यमातून गावगाड्यावर सत्ता काबीज करण्याचा देखील प्रयत्न केला जातो; परंतु सरपंच सातवी पास असावा असा निर्णय घेतल्यामुळे अंगठेबहाद्दर सरपंच यापुढील काळात ग्रामपंचायतीतून हद्दपार होणार असल्याने सुशिक्षितांच्या हाती गावगाडा जाणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup साठी आज भारतीय संघाची घोषणा, कुणाला संधी, कोण बाहेर? 'या' पाच प्रश्नांची मिळणार उत्तरं...

थरारक प्रसंग! मृत्यूच्या दाढेतून परतले महसूल अधिकारी! माळशिरस महामार्गावर दोन तरुणांच्या धाडसामुळे वाचले प्राण, क्षणभर उशीर झाला असता तर...

Mumbai Mega Block : मुंबईत ब्लॉकमुळे उद्या १३ रेल्वेंवर परिणाम

Vidarbha Cold Wave: विदर्भात थंडीचा कडाका: नागपूर पारा ८.५ अंश, गोंदियेत ८ अंश सेल्सिअस

BMC Elections: देशातील हिंदू 1992 पुन्हा घडवण्यासाठी तयार... BMC निवडणुकीपूर्वी धीरेंद्र शास्त्रींचं मुंबईत वक्तव्य! राजकीय अर्थ काय?

SCROLL FOR NEXT