vineyard 
सोलापूर

नुकसानग्रस्त शेतकऱ्याने कांदा, ज्वारी, गहूऐवजी लावली द्राक्षे ! नशिबानेही साथ दिली; पहिल्याच वर्षी मिळाले 24 लाखांचे उत्पन्न

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : दिवसभर कष्ट केले तर संध्याकाळी घरी चूल पेटायची, अशी परिस्थिती! कांदा, ज्वारी, गहू अशा निसर्गावर अवलंबून असलेल्या पिकांमध्ये नेहमीच नुकसान आले. संसार चालवताना अनेक अडचणींना तोंड देत यावर्षी धाडस करून द्राक्ष बाग लावली अन्‌ पहिल्याच वर्षी साथ मिळाली. द्राक्षे चीन, रशिया व मलेशियासह दिल्लीच्या बाजारपेठेत विक्री होऊन 24 लाखांचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती बार्शी तालुक्‍यातील बावी येथील शेतकरी कल्याण चंद्रसेन आगलावे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

अशिक्षित शेतकरी असलेले कल्याण आगलावे म्हणाले, दुष्काळी परिस्थिती, बार्शी सोडून मुंबईला गेलो. मजूर म्हणून शिर्के बिल्डर यांच्याकडे काम केले. पाच वर्षे होतो पण जीव शेताकडे जास्त होता. परत बावी गाठले. निसर्गावर अवलंबून शेती. पत्नीसह दोघेही रोजंदारीवर कामावर जात होतो. एकदा तर रोजगार हमी योजनेवर कामावर गेलो असताना कामावर घेतले नव्हते. त्या वेळी खूप वाईट वाटले; पण आज लाखोंचं उत्पन्न घेतले, असे सांगताना त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू आवरणे कठीण झाले. 

आपल्या शेतीतील यशाबाबत कल्याण आगलावे म्हणाले, शहरापासून दहा किलोमीटर अंतरावरील तुळजापूर रस्त्यावर बावी हे गाव. बस स्थानकासमोरच नऊ एकर शेती. त्यापैकी सव्वादोन एकर शेतीमध्ये प्रथम सेंद्रिय खतांचा वापर, जैविक फवारणी करून विषमुक्त द्राक्ष घेण्याचा प्रयोग केला अन्‌ यशस्वी झालो. सुरवातीला ज्वारी, गहू व कांदे अशी पिके घेतली. त्यातही नुकसान झाले. नंतर उसाचे पीक घेतले. पण कारखाना बंद पडला आणि 180 टन उसाचे सुमारे साडेतीन लाख रुपये अडकून पडले. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलो. 

महागावचे आप्पा घोलप यांनी मोलाचे मार्गदर्शन केले अन्‌ म्हणाले, दहा एकराचे उत्पन्न एकीकडे आणि एक एकराचे एका बाजूला. तू द्राक्ष बाग लाव. त्या वेळी लगेच निर्णय घेऊन स्टेट बॅंकेचे सहा लाखांचे कर्ज काढले. एस. एस. जातीची द्राक्ष बाग ड्रीपसह उभी केली. 

पत्नी चित्रा, मुलगा दत्तात्रय, सून कोमल यांच्यासह दोन शेतमजुरांनी शेतामध्ये अहोरात्र काम केले. वादळी वारे, अतिवृष्टी, पाऊस यापासून द्राक्ष बागेची काळजी घेतली. फवारणी केली आणि बाग फुलवली. रशिया व मलेशिया येथे 12 टन 630 किलो द्राक्ष 72 रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली तर चीनला दोन टन द्राक्ष 65 रुपये 50 पैसे प्रतिकिलो दर मिळाला. 19 टन द्राक्ष दिल्ली येथील बाजारपेठेत पाठवली असता तेथे 47 रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. 

शेतकरी ते ग्राहक अशी यंत्रणा प्रथमच राबवून बार्शी शहरातील यशवंतराव चव्हाण सभागृह, उपळाई रोड, तुळजापूर रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर, बावी स्टॅंड येथे ट्रॅक्‍टर, टेम्पो नेऊन, स्टॉल लावून अडीच टन द्राक्ष विक्री झाली. त्यातून 1 लाख 70 हजार रुपये उत्पन्न मिळाले. 
- दत्तात्रय आगलावे, 
प्रयोगशील तरुण शेतकरी, बावी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : आता मंत्रालयात नाही तर शेतकऱ्याच्या बांधावर होणार शेतीची चर्चा; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितला उत्पन्नाचा मंत्र!

Sunday Special Recipe: सुट्टीच्या दिवशी ट्राय करा घरगुती खास पुलाव, बनवायला अगदी सोपा

Pushkar Singh Dhami : वन्यजीव हल्ल्यांवर मुख्यमंत्र्यांचा अ‍ॅक्शन मोड; ३० मिनिटांपेक्षा उशीर झाला तर वनअधिकाऱ्यांवर कारवाई!

आजचे राशिभविष्य - 14 डिसेंबर 2025

Asia Cup Trophy Controversy : ‘ऑपरेशन’ आशिया करंडक

SCROLL FOR NEXT