'उजनी' @ 100.45 टक्के Canva
सोलापूर

उजनी अजूनही १०० टक्के! शेतीला १७ जानेवारी तर शहरासाठी २० जानेवारीनंतर सुटणार पाणी

उजनी धरणाची साठवण क्षमता १२३ टीएमसीपर्यंत असून पावसाळा संपला, त्यावेळी धरण हाऊसफुल्ल होते. आता पावसाळा संपून अडीच महिने होऊनही उजनीत १००.४५ टक्के पाणीसाठा आहे. धरणातून १७ जानेवारीपासून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरणाची साठवण क्षमता १२३ टीएमसीपर्यंत असून पावसाळा संपला, त्यावेळी धरण हाऊसफुल्ल होते. आता पावसाळा संपून अडीच महिने होऊनही उजनीत १००.४५ टक्के पाणीसाठा आहे. धरणातून १७ जानेवारीपासून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे.

भीमा नदीच्या पात्रात बांधण्यात आलेले उजनी धरण हे सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. धरणाची भिंत सोलापूर जिल्ह्यात आहे, पण सर्वाधिक पाणीसाठा पुणे जिल्ह्यातच होतो. सहा किलोमीटरपेक्षा रुंदी व १४० किलोमीटरहून लांबी असलेले उजनी धरण आहे. धरणाच्या पाण्यावर ४० हून अधिक साखर कारखाने, १४ औद्योगिक वसाहती, शेती व शेतीपुरक व्यवसाय, गोड्या पाण्यातील मासेमारी, असे व्यवसाय अवलंबून आहे. त्या सर्वांची दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल होते. धरणातून सीमा-माढा, दहिगाव या योजनांमधून शेतीला पाणी दिले जाते. कॅनॉल व बोगद्यातूनही शेतीला पाणी मिळते. भीमा नदीतून सोलापूर शहराला पाणी सोडले जाते. त्याचा नदी काठावरील शेतीला मोठा लाभ झाला आहे. यंदा पावसाळ्यात सलग दोन-अडीच महिने उजनीच्या पाण्यावर विद्युत प्रकल्प सुर होता. त्यातून यंदा रेकॉर्डब्रेक तीन कोटी युनिट वीजनिर्मिती झाली आहे. सोलापूरसह नगर व पुणे जिल्ह्यासाठी उजनी धरण वरदानच आहे.

उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही

उजनी धरणात सध्या १०० टक्के पाणीसाठा आहे. आता १७ जानेवारीपासून कॅनॉलद्वारे शेतीसाठी महिनाभर पाणी सोडण्यात येणार आहे. पावसाळा संपून अडीच महिने होऊनही धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने यंदा उन्हाळ्यात धरण मायनसमध्ये जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. सर्वांनी पाण्याचा अपव्यय टाळावा.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र प्राधिकरण, सोलापूर

शहरासाठी २५ जानेवारीपर्यंत सुटणार पाणी

सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात आणखी काही दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. तत्पूर्वी, महापालिकेकडून पाणी सोडण्याच्या मागणीचे पत्र लाभक्षेत्र प्राधिकरणाला पाठविण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूर शहरातील नागरिकांसाठी २० ते २५ जानेवारी दरम्यान भीमा नदीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. त्यानंतर पुढील दीड-दोन महिने शहराच्या पाण्याचा प्रश्न दूर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT