vneera nadit mrutyu.jpg 
सोलापूर

नीरा नदीच्या पात्रात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू 

मनोज गायकवाड

श्रीपूर (सोलापूर) :  अकलूज येथे नीरा नदी पात्रात पोहण्यास गेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना आज घडली आहे. शक्ती चंद्रकांत गवळी (वय 16), करण रणजित लांडगे (वय 14 ) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. 

महर्षि काॅलनी परिसरातील शक्ती चंद्रकांत गवळी, करण रणजित लांडगे, अवधुत हिरा कांबळे व भैया जगन खंडागळे हे चौघेजण दुपारी नीरा नदीच्या पात्रात पोहण्यास गेले होते. नदीच्या घाटापासून थोडे अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. 

हेही वाचाः माझी रायगडवारी 

त्यामुळे शक्ती गवळी व करण लांडगे हे पाण्यात बुडाले. अवधुत कांबळे व भैया खंडागळे यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो व्यर्थ ठरला. त्यानंतर या दोघांनी पात्रातून बाहेर येऊन घरी फोन लावला. त्यानंतर महर्षीनगर परिसरातील अनेक तरूणांनी नदी घाटाकडे धाव घेतली. 
काही तरुणांनी पाण्यात शोध घेतला असता, या दोघांचे मृतदेह सापडले. यावेळी शक्ती आणि करणच्या परिवाराला शोक अनावर झाला होता. या दुर्घटनेमुळे महर्षी का×लनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT