jai shri ram sakal
सोलापूर

Ayodhya Ram Mandir : पोस्टकार्डावर लिहिले १०८ वेळा जय श्रीराम

अक्षरमित्राची अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठापनेसाठी अनोखी रामभक्ती

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सध्या अयोध्येसह संपूर्ण जग भगवान रामलल्लाच्या आगमनाची, मूर्ती स्थापनेची आतुरतेने वाट पाहत असताना, सोलापुरातील तरुण तरी मागे कसे राहतील? अशीच प्रचिती सोलापुरात आली आहे. अक्षरमित्र अभिजित भडंगे यांनी पोस्टकार्डावर चक्क एकशे आठ (१०८) वेळा ‘जय श्रीराम‘ हा चैतन्यदायी जपमंत्र सुंदर हस्ताक्षरात लिहिला आहे.

स्वतः तयार केलेल्या कटनिबच्या शाईपेनने त्यांनी ही ‘रामभक्ती‘ साकारत रामनामाचा जप केला आहे. यासाठी त्यांना तब्बल दोन तास वीस मिनिटे एवढा वेळ द्यावा लागला. प्रत्येक दहावा जप त्यांनी ‘लालशाई‘ मध्ये लिहिला. हिंदू धर्मात १०८ अंक हा जपासाठी, प्रदक्षिणेसाठी, दानासाठी अतिशय शुभ मानला जातो.

पोस्टकार्डच्या पुढच्या बाजूस ८४ व मागील बाजूस २४ वेळा, असे एकूण १०८ वेळा अक्षरमित्र अभिजित भडंगे यांनी काळ्या व लाल रंगाच्या सुंदर हस्ताक्षरात जय श्रीराम लिहीत अनोख्या पद्धतीने भगवान प्रभू श्रीरामचंद्रांची अक्षरभक्ती केली आहे.

तसेच सोलापूरमध्ये चित्रकार, नृत्य, शिल्प, गायन, वादन असे विविध क्षेत्रात असंख्य कलाकार आहेत. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने भगवान रामाला अभिवादन करत जल्लोष करत हा उत्सव अधिक संस्मरणीय करावा, असे आवाहन अक्षरमित्र अभिजित भडंगे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahua Moitra: तुम्ही इतके स्वस्त आहात का? आमच्या लोकांना ४ कोटी आगाऊ अन् दरमहा १ कोटी; ठाकरेंच्या खासदारांना सवाल!

Monorail: मोनोरेल सुरू होणार पण प्रवाशांच्या खिशाला कात्री, तिकीटांच्या किंमती वाढणार? नवे दर किती आणि कधीपासून लागू?

लग्न होऊनही 5 वर्षांपासून लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहतेय रसिका सुनील, नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली...

Latest Marathi News Live Update : इम्तियाज जलील यांच्या विधानाला ठाकरे गटाचा पाठिंबा, देशात हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप

Kolhapur Water Crisis: कोल्हापुरात पाणीबाणी, एकाच वेळी सर्व योजना बंद पडण्याची इतिहासात पहिलीच घटना; भोगावती, पंचगंगेच्या पातळीत मोठी घट

SCROLL FOR NEXT