Student Literature Meeting in Ahmednagar on Thursday 
पश्चिम महाराष्ट्र

नगरमध्ये गुरूवारी विद्यार्थी साहित्य संमेलन 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा व शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनतर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त गुरुवारी (ता. 27) सकाळी 9.30 वाजता नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन्स येथे एकदिवसीय विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.

 
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा व मराठी भाषा अधिक समृद्ध व्हावी, यासाठी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून आपल्या शहरात प्रथमच विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.


ज्येष्ठ बालसाहित्यिक व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ल. म. कडू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या विद्यार्थी साहित्य संमेलनात आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, आशा फिरोदिया, जिल्हा पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, महापालिका उपआयुक्त डॉ. प्रदीप पठारे, साहित्यिक प्रा. सु. प्र. कुलकर्णी, डॉ. संजय कळमकर, प्रा. शशिकांत शिंदे, शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, रमाकांत काटमोरे, सुभाष पवार आदी उपस्थित राहणार आहेत. 


ग्रंथपूजन, उद्‌घाटन, लेखक तुमच्या भेटीला, बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत अभिनयाचे रौप्यपदक मिळविणारी "पिंटी' एकांकिका एकपात्री प्रयोग होणार आहे, अशी माहिती मसाप सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह व संमेलनाचे संयोजक जयंत येलूलकर यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT