पश्चिम महाराष्ट्र

आगामी हंगामात उसाची हाेणार पळवापळवी !

विकास जाधव

काशीळ : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात ऑगस्टच्या सुरवातीस झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध पिकांसह ऊस पिकाची मोठी हानी झाली आहे. कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांसह सातारा, जावळी, वाई तालुक्‍यांतील नदीकाठचा ऊस पाण्याखाली राहिल्याने ऊस कुजल्याने उत्पादनात घट होणार आहे. परिणामी आगामी ऊस गाळप हंगामात उसाचा तुटवडा भासणार असल्याने साखर उत्पादनात घट होणार आहे. 
अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेला पूर, तसेच शेतात पाणी साचल्याने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत अपरिमित हानी झाली आहे. तीनही जिल्ह्यांत ऊस पीक मोठ्या प्रमाणात असल्याने या पिकास सर्वाधिक फटका बसला आहे. महापूर आलेल्या व नदीकाठचा ऊस दहा ते 12 दिवस पाण्याखाली राहिला होता. यामुळे अनेक ठिकाणचा ऊस कुजण्याबरोबरच वाढीवर परिणाम झाला आहे. कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांत अनेक गावांत या महापुरामुळे हानी झाली आहे. या दोन तालुक्‍यांत पाच साखर कारखाने आहेत. यामध्ये सह्याद्री, कृष्णा वगळता इतर सर्व कारखान्यांचे कार्यक्षेत्र स्थानिक कऱ्हाड व पाटण तालुका असल्याने येथे ऊस कमी पडणार आहे. 
सर्व कारखान्यांची वार्षिक सर्वसाधारण सभेची तयारी सुरू असून, काही कारखान्यांचे मिल रोलर पूजन झाले आहे. हंगामाच्या तयारीत ऊसतोड मजुरांचे करार, कारखानांतर्गत कामे सुरू आहेत. साखरेचे किमान विक्री मूल्य निश्‍चिती, तसेच निवडणुकांमुळे उसाला पहिला हप्ता चांगला मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. हंगामाच्या तयारी सुरू असलेतरी ऊस मात्र कमी पडण्याची शक्‍यता आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील साखर कारखाने या अगोदरही सातारा जिल्ह्यातील ऊस गाळपासाठी नेत होते. आता तर या दोन जिल्ह्यांतील ऊस खराब झाला असल्याने सातारा जिल्ह्यातून जास्त ऊस नेला जाण्याची शक्‍यता आहे. परिणामी गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी उसाची पळवापळवी होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. 

शेतकऱ्यांना राहणार चॉईस 

उसाचे झालेले नुकसान, तसेच लागवडीच्या क्षेत्रात झालेली घट यामुळे गाळपास ऊस कमी पडणार आहे. या हंगामात अनेक कारखानदारांना उसासाठी शेतकऱ्यांच्या दारात यावे लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना ऊस कोणत्या कारखान्यास द्यावा हा "चॉइस' राहणार आहे. आपल्या कारखान्याला ऊस मिळावा, यासाठी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील कारखान्यांच्या तुलनेत जास्त दर द्यावा लागणार आहे. 


निवडणुकांच्या अगोदर बिल मिळणार? 

जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखानदार विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार असणार आहेत. निवडणुकीच्या इतर प्रचारावर ऊस बिल मुद्दा हा कळीचा ठरणार आहे. कोणी किती बिल दिले, इतरच्या तुलनेत कमी जास्त, ऊसतोड, मजुरांचे पगार आदी मुद्‌द्‌यांवर प्रचार रंगणार आहे. मतदारांना खूष करण्यासाठी निवडणुकीअगोदर बिले जमा देण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT