Swabhimani Shetkari Sanghatana leader Raju Shetti esakal
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election : महायुती की महाविकास आघाडी? लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींनी घेतला मोठा निर्णय

भाजपप्रणित महायुती (Mahayuti) आणि विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी गटाकडून आपल्याशी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) अनुषंगाने संपर्क सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

'मला राजकारणात करिअर करायचे नव्हते किंवा यापुढेही करायचे नाही. मला जे करायचे होते, ते करून झाले आहे.'

इस्लामपूर : ‘‘सत्ताधारी भाजपप्रणित महायुती (Mahayuti) आणि विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी गटाकडून आपल्याशी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) अनुषंगाने संपर्क सुरू आहे. दोघांनीही त्यांच्याबरोबर येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे; मात्र मी कोणाहीबरोबर जाणार नाही. मला त्यांच्यात रस नाही, मी स्वतंत्र लढणार आहे,’’ असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी बुधवारी केले.

वाळवा तालुक्यातील शेतकरी (Farmer) व कार्यकर्त्याची भेट त्यांनी घेतली. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविणार निवडणूक आणि तयारीच्या पार्श्वभूमीवर शेट्टी म्हणाले, ‘‘माझी निवडणूक अथवा उमेदवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी व ग्रामीण भागातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आहे.

मला राजकारणात करिअर करायचे नव्हते किंवा यापुढेही करायचे नाही. मला जे करायचे होते, ते करून झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना ही केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी केली होती आणि मी त्यावर आधीपासून ठाम आहे.’’

मला राजकारण करायचे नाही. मी सर्वसामान्य घटक, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे.

-राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT