Tembhu water should reach farmers' dams ... 
पश्चिम महाराष्ट्र

टेंभूचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहचले पाहिजे...

हिरालाल तांबोळी

घाटनांद्रे : टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहचले पाहिजे. घाटमाथ्यावरील सर्व क्षेत्र ओलिताखाली आले पाहिजे. वर्षातून तीन आवर्तने झाली पाहिजेत. योजनेचा फेरसर्व्हे झाला पाहिजे. या मागण्या त्वरीत पूर्ण झाल्या पाहिजेत. अन्यथा आंदोलन करण्यात येईल. 
असा इशारा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अप्पासाहेब शिंदे यांनी दिला आहे. घाटमाथ्यावरील सरपंच, उपसरपंच यांच्या बैठकीत ते बोलत होते. 

शिंदे पुढे म्हणाले "घाटनांद्रेचा पूर्वभाग वगळता टेंभू योजनेचे काम सद्या बंद आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाईप उकरुन टाकल्याने त्यांना शेतात पीक घेता येत नाही. टेंभू योजनेचा तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, शेळकेवाडी, कुंडलापूर, जाखापुर, केरेवाडी, रायवाडी आदी गावास लाभ मिळणे आवश्‍यक आहे. मात्र यातून कुंडलापूर, वाघोली, गर्जेवाडी, शेळकेवाडीचा काही भाग वगळण्यात आला आहे.

ऑगस्ट अखेर योजनेचे काम पूर्णत्वास येईल. आतापर्यंत 50 टक्के निधी खर्च झाला आहे. 100 एकरावर चेंबर बसवण्यात येईल असे योजनेच्या संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र आजही काम बंद अवस्थेत आहे. 

या मागण्या बाबतचे लेखी निवेदन जलसंपदा मंत्री,ग्रामीण विकास मंत्री यांना पाठवण्यात आले आहे. त्यांचेकडूनही याची दखल घेण्यात आली नाही. एकंदर या योजनेपासून घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांना वंचित ठेवले जाते आहे. टेंभू योजनेचे काम त्वरित सुरु करावे,वगळलेल्या गावांचा फेरसर्व्हे करुन समावेश करावा आदी मागण्या बैठकीत करण्यात आल्या. यावेळी प्रल्हाद हाक्के, सुरेश गायकवाड, अनिता शिंदे, पोपट गिड्डे, शिवाजी बोराडे, चंद्रकांत जगदाळे, कैलास साळुंखे मच्छिंद्र पाटील, शंकर शिंगाडे उपस्थित होते. 


संपादन : प्रफुल्ल सुतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT