vidyagama policy start newly in belgaum the government take a decision in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात विद्यागम योजना पुन्हा सुरू होणार

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : शिक्षण खात्याने विद्यागम योजना तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुढील महिन्यातही शाळा सुरू न झाल्यास विद्यागम योजना पुन्हा सुरू करण्याचा विचार शिक्षण खात्याने चालविला आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन निर्णय घेतला जाईल.

अर्धे शैक्षणिक वर्ष संपले, तरी अजूनही शाळा सुरू नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता विद्यागम योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. ज्यावेळी योजना तात्पुरती बंद करण्याचा निर्णय झाला, तेव्हापासून ग्रामीण भागातील पालक व विद्यार्थ्यांतून विद्यागम योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

विद्यागम योजनेमुळे राज्यातील ४ लाख ३४ विद्यार्थ्यांना लाभ मिळत होता. काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे कारण पुढे करत विद्यागम बंद केले. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाण्याची शक्‍यता आहे. परिणामी, शाळा लवकर सुरू न झाल्यास विद्यागम विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरेल, असे मत जाणकारांतून व्यक्‍त होत आहे. राज्यात सरकारी व अनुदानित शाळांत विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मार्चअखेरीस लॉकडाउन जाहीर केल्यापासून सर्व शाळा बंद झाल्या आहेत.

शैक्षणिक वर्षही वेळेत सुरू झालेले नसून पुढील महिन्यातही शाळा सुरू होण्याची शक्‍यता कमी आहे. काही महिन्यांपासून शहरी भागासह इतर भागांतील काही खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांसाठी विद्यागम योजनेशिवाय पर्याय नाही.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Accident: सूर्योदय पाहून परतताना क्षणात सर्व संपलं… मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघातात IIT च्या तीन विद्यार्थ्यांचा अंत

US Visa Bond Policy : डोनाल्ड ट्रम्प यांचा ५० देशांना दणका ! व्हिसा बाँड केला अनिवार्य, नेमकं काय आहे प्रकरण ?

Dharashiv:धाराशिवमध्ये गुढीपाडव्याला म्हशी-रेड्यांच्या शर्यतीचा थरार; परंपरेचा जल्लोष

Chhatrapati Sambhajinagar: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरखरेदीचा उत्साह; २५० गृहप्रवेशासह बाजारात तेजी

विद्यापीठाचा मोठा निर्णय! 'सीसीटीव्ही' असलेल्या कॉलेजमध्येच आता परीक्षा केंद्र; ‘लॉ’ची परीक्षा त्याच महाविद्यालयात, २ एप्रिलपासून परीक्षा, वाचा...

SCROLL FOR NEXT