पश्चिम महाराष्ट्र

तासगाव तालुक्‍यात दुष्काळाचे सावट गडद

रवींद्र माने

तासगाव - तासगाव तालुक्‍यात दुष्काळाचे  सावट गडद झाले असून, पूर्व भागात शेती आणि पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे. द्राक्षबागांच्या छाटण्या झाल्यानंतर आता बागांना पाणी कोठून आणायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. येरळा नदी कोरडी पडल्याने काठावरील हजारो एकर बागायत शेती धोक्‍यात आली आहे. विसापूर, पुणदी आणि आरफळ योजनेमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

 निवडणुकीचे मतदान झाले आणि आता दुष्काळाच्या  झळा जाणवू लागल्या आहेत, निवडणुकीच्या आभासी जगातून तालुका भानावर आला आहे. आरोप- प्रत्यारोपाच्या धुरळ्यात ‘दुष्काळ गेला वाहून’  अशी परिस्थिती झाली होती; मात्र तालुक्‍यातील भीषण दुष्काळाचे चित्र आता समोर आले आहे. तालुक्‍यातील बहुतांशी तलाव कोरडे पडले आहेत. विसापूर पुणदी योजनेतून काही तलावात पाणी सोडल्याने त्या त्या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. असे असले तरी पूर्व भागात पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत आहे. तालुक्याचे अर्थकारण असलेल्या द्राक्षबागा कशा जगवायच्या, हाच प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मिळेल तेथून टॅंकरने दिवसरात्र पाणी मिळवावे लागत आहे. 

येरळा नदीमध्ये काही वर्षे नियमित पाणी सोडले जात होते, मात्र गेल्या वर्षी आमदार सुमनताई पाटील यांना चक्क नदीपात्रात उपोषण करावे लागले होते. याही वर्षी आता नदी पूर्ण कोरडी पडली असून पात्रातील विहिरींनी २५ फुटांचा तळ गाठला आहे. ताकारी आरफळचे पाणी सोडले जात असल्याने नदीकाठावर हजारो एकर  बागायत शेती वाढली आहे, मात्र पाणी नसल्याने ही शेती धोक्‍यात आली आहे.

पाणी योजनांचा दिलासा  
तासगाव तालुक्‍यातील दुष्काळावर टेंभू योजनेवरील विसापूर पुणदी योजना आणि आरफळ या योजनांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पाण्याचे उद्‌भव वाढणे आणि दुष्काळाची तीव्रता कमी करणे या योजनांमुळे शक्‍य झाले आहे. पुढील महिनाभर या योजना सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.

दररोजचा साडेसात लाख लिटरचा पाणीपुरवठा 
६९ पैकी २२ गावे, १२७ वाड्यांवर ११ टॅंकर ४० खेपांद्वारे पाणी देण्यात येत आहे. दररोज साडेसात लाख लिटर पाणीपुरवठा सुरू आहे. ही संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT