Water Shortage in Jat Taluka Mhaisal Scheme esakal
पश्चिम महाराष्ट्र

कर्नाटकच्या पाण्याची 46 गावांना आस, जत तालुक्यात टंचाईच्या झळा; द्राक्षबागा, डाळिंब, ऊस पिके अडचणीत

महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या सरकारकडे अधिकृतपणे टंचाई निवारणाचा भाग म्हणून पाण्याची मागणी केली पाहिजे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या कृष्णा नदी वाहती ठेवण्यासाठी म्हणून वारणा आणि कोयना धरणातून सोडलेले पाणीच कर्नाटकातील सिंचन योजनांना मिळत आहे.

सांगली : जत तालुक्यासाठी विस्तारित म्हैसाळ योजनेची (Mhaisal Scheme) कामे तातडीने सुरू व्हावीत, यासाठी आंदोलने सुरू आहेत. मात्र त्याहून अधिक सध्याची गरज म्हणजे या भागातील ४६ गावांमधील नगदी पिके जगवण्यासाठी कर्नाटकातून तातडीने पाणी पुरवठा व्हावा, यासाठी पाठपुराव्याची गरज आहे. जानेवारीपासूनच या भागात टंचाईच्या झळा बसत आहेत.

याबाबत महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या सरकारकडे अधिकृतपणे टंचाई निवारणाचा भाग म्हणून पाण्याची मागणी केली पाहिजे. सध्या या प्रश्‍नाकडे लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी या सर्वांचेच दुर्लक्ष आहे. परिणामी सुमारे चार हजारांवर द्राक्षबागा, डाळिंब, ऊस पिके अडचणीत आहेत.

जत तालुक्याच्या आग्नेय भागातील उमदी आणि परिसरातील ४६ गावे म्हैसाळ योजनेपासून वंचित आहेत. तथापि या भागास गेल्या काही वर्षांत कर्नाटकातून पाणी पुरवठा होत आहे. सीमेवरील विजयपूर जिल्ह्यातील यत्नाळ तलावापर्यंत कर्नाटकच्या सिंचन योजनांचे पाणी येते. तिथून हे पाणी चडचण तालुक्यात महाराष्ट्रातील उमदी-जालिहाळ भागातून नैसर्गिक उताराने ओढ्या-ओढ्यांतून जाते. या योजनेतून ४६ गावांतील टंचाई संपली आहे.

गेल्या काही वर्षांत दोन्ही तालुक्यांतील शेतकरी स्थानिक नेतेमंडळींशी संपर्क साधून कर्नाटकातून पाणी पुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्नशील असतात. जवळपास साडेचार हजार एकरांवर द्राक्षबागा, तितकेच डाळिंब क्षेत्र, दीड हजार एकरांवर ऊस असे पीक क्षेत्र या भागात आहे. या भागासाठी कर्नाटकच्या सिंचन योजनांमधून पाणी घ्यावे, यासाठी येरळा प्रोजेक्ट सोसायटीने सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून आता या भागासाठी स्वतंत्र विस्तारित म्हैसाळ योजना मंजूर झाली.

सुमारे नऊशे कोटींची कामे सध्या प्रस्तावित आहेत. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी साडेसहा टीएमसी पाणी केवळ जतसाठी राखीव ठेवण्याची घोषणा केली. त्यानंतर सर्वांचा फोकस ही विस्तारित म्हैसाळ योजना पूर्ण करण्याकडे आहे. सध्या उमदी आणि बालगावमध्ये यासाठी आंदोलनेही सुरू आहेत. कर्नाटकला याआधी महाराष्ट्रातून दिलेले साडेतीन टीएमसी पाणी शिल्लक आहे.

सध्याही कृष्णा नदी वाहती ठेवण्यासाठी म्हणून वारणा आणि कोयना धरणातून सोडलेले पाणीच कर्नाटकातील सिंचन योजनांना मिळत आहे. तेथील शेतकरी हे पाणी जत तालुक्यात येण्यापासून रोखत आहेत. आजघडीला यत्नाळ तलाव भरला आहे. याशिवाय, शिरनाळ कालवा पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. तेथे पाण्याची उपलब्धता आहे, तर शेजारीच महाराष्‍ट्रातील भाग पाण्यासाठी आसुसलेला आहे.

विस्तारित म्हैसाळ योजना पूर्ण होण्यासाठी बराच अवधी लागणार आहे. तोपर्यंत आपल्याला कर्नाटकच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागणार आहे. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई उपाययोजनांचा भाग म्हणून कर्नाटक सरकारशी अधिकृतपणे पत्रव्यवहार करावा. त्या बदल्यात वारणा धरणातून जतसाठी राखीव असलेले पाणी कर्नाटकला द्यावे.

-एन. व्ही. देशपांडे, सचिव, येरळा प्रोजेक्ट सोसायटी

सध्या कर्नाटकला पाण्याची आवश्‍यकता आहे. आपल्याकडे नैसर्गिक उताराने येणारे पाणी त्यामुळेच कमी झाले आहे. त्यासाठी वारणा धरणातून जतसाठी राखीव असलेले पाणी कर्नाटकला देऊन तिथून तातडीने पाणी मिळावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. मी त्यांची भेट घेत आहे.

-विक्रम सावंत, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant : लडाखमध्ये नवं न्यायालय सुरू; दुर्गम भागात न्याय मिळणं होणार सोपं, CJI सूर्यकांतांचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: ना होर्डिंग, ना डीजे, तरीही जयंती दणक्यात साजरी!; महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाने घालून दिला आदर्श

New Rules From April 1 India : देशात आजपासून अनेक कायदे आणि नियमांत बदल होणार, डिजीटल पेमेंटसाठी कडक सुरक्षा

Latest Marathi News Live Update : हवाई दलासाठी पर्वतीय रडारची खरेदी

आनंदाची बातमी! विद्यार्थिनींना मिळणार दोन हजार विद्यावेतन: चंद्रकांत पाटील यांची घोषणा, ‘कमवा आणि शिका’ उपक्रम

SCROLL FOR NEXT