mangalwedha
mangalwedha 
पश्चिम महाराष्ट्र

गांधीजीचं शेती विषयीचं शहाणपण आमच्या लक्षातच आलं नाही - अभय भंडारी

सकाळवृत्तसेवा

मंगळवेढा - समाज आज आनेक व्याधींनी जर्जर झालेला आहे. जेवणाच्या ताटातील अन्न शुद्ध नाही. विषारी किटकनाशकं वापरल्यामुळे काहीही शुद्ध राहिलं नाही. आपण प्रश्न सोडविण्यापेक्षा टोलविण्यात पारंगत झालो असल्याची खंत साहित्यिक वक्ते अभय भंडारी यांनी  व्यक्त केले.

रतनचंद शहा स्मृती व्याख्यानमालेत भारतीय शेती चिंता आणि चिंतन या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. सुरुवातीला स्व. रतनचंद शहा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. बँकेचे चेअरमन राहूल शहा, उपाध्यक्ष रामचंद्र जगताप, मुझफ्फर काझी, ॲड. रमेश जोशी शिवदास चिंचकर, भुजंगराव पाटील, किसन गवळी, डी.के. दत्तु, चंद्रशेखर कौंडूभैरी, हजरत काझी, भीमराव मोरे, शरद हेंबाडे, जनार्दन नेने, इन्नुस शेख, कवी शिवाजी सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना भंडारी म्हणाले की, देशी गाय मालकाला ओळखते पण जर्सी निर्बुद्धतेने वागते. तरीही आपण जर्सीलाच जास्त पौष्टीक खाऊ घालतो. कृषी शिक्षण घेतलेले शंभरातले पाचही विद्यार्थी शेती करत नाहीत. शेतीकडे पाठ फिरवल्याने शेतीचा सत्यानाश झाला. महात्मा गांधीचं शहाणपण लक्षात यायला हवं. गावाला लागतं ते गावातच निर्माण झालं पाहिजे. पण माणसांची मानसिकताच विचित्र झाली. आपल्याच जमिनीतलं पाणी आपल्याला पचत नाही तेव्हा मिनरल वॉटरसाठी हजारो कोटी खर्चणारे कोडगेपण इथे आहे. एक रुपयाची नोट न पाहता हजारों लोक सुखाने जगले. उघड उघड समाजाचा सत्यानाश होत असताना आम्ही पाहत बसण्यापेक्षा कागदाच्या डिग्र्या चुलीत घालण्याची वेळ आली. खेडी हेच तुमचं भविष्य आहे. शहरात जीवनच नसल्याने सुखाचा श्वासही कोठून येणार. 

यावेळी प्रास्ताविक ॲड. रमेश जोशी यांनी केले तर, आभार व्यवस्थापक हेमंत गरवारे यांनी मानले. सूत्रसंचालन राजेंद्रकुमार जाधव यांनी केले. दत्तात्रय शिर्के, राजेंद्र कट्टे, अंबादास बेंद्रे, विजयकुमार जगताप, चंद्रकांत कोंडूभैरी, संदीप पुळुजकर, विष्णू जावळे, संतोष घाडगे, विवेक चिंचकर यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT