Raju_Shetty 
पश्चिम महाराष्ट्र

जानकर, आठवलेंना योग्यवेळी महाविकास आघाडीत आणू : राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : भारतीय जनता पक्षात (कै.) गोपीनाथराव मुंडे यांना सातत्याने डावलण्यात आले आहे. (कै.) मुंडे यांच्याबाबतीत भाजप जशा पद्धतीने वागत होता तशाच पद्धतीने आज मुंडे समर्थकांना भाजपमध्ये वागणूक मिळत आहे. भाजपमधील वागणुकीची मुंडे समर्थकांची जखम तशी जुनीच आहे. हीच जुनी जखम आज भळभळू लागली असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज सोलापुरात झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी खासदार शेट्टी म्हणाले, सदाभाऊ खोत यांच्याशी कधी माझं बोलणं होत नाही परंतु माजी मंत्री महादेव जानकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विनायक मेटे यांच्याशी माझे आजही अधून-मधून बोलणे होते. माझ्या या जुन्या मित्रांना योग्य वेळी महाविकास आघाडीत मी घेऊन येईन, अशी माहितीही शेट्टी यांनी दिली. नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यातील संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. 11 जानेवारीपर्यंत सर्व नवीन जिल्हाध्यक्षांची निवड केली जाईल. 11 फेब्रुवारीपर्यंत प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा कॉंग्रेसच्या नेत्यांसोबत माझ्या मंत्रिपदाबाबत अद्याप कसलीही चर्चा झाली नाही. आम्हाला सत्तेत घ्यावे यासाठी याचक म्हणून कटोरा घेऊन आम्ही कोणाकडेही जाणार नाही. मी मंत्री झालो तरीही माझ्या भाषेत बदल होणार नाही, आज मी जे शेतकऱ्यांसाठी बोलतोय तीच माझी भाषा कायम राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

"ढेकूण झाले म्हणून कोणी घर जाळतंय का?' 
बाजार समित्यांमध्ये दोष आहेत. दोष आहेत म्हणून बाजार समित्याच बरखास्त करणे म्हणजे ढेकूण झाले म्हणून घर जाळण्यासारखे आहे. ई-नाम आणि नवीन तंत्रज्ञानाला आम्ही कधीच विरोध केला नाही. ई-नाम राबविण्याची बाजार समित्यांची क्षमता आहे का? याचाही अभ्यास करावा. ई-नाममध्ये लहान शेतकऱ्यांना बाजारपेठ कशी मिळणार, याबद्दलही विचार झाला पाहिजे, असे राजू शेट्टी म्हणाले. 

"सातबारा कोरा करा, पाच वर्षे काहीच देऊ नका' 
शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे हा काय अंतिम उपाय नाही, परंतु आज शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याशिवाय पर्यायही नाही. शेतकऱ्यांना तुकड्या तुकड्यांमध्ये कर्जमाफी नकोय. एकदाच सरसकट कर्जमाफी द्या, पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना काही नाही दिले तरीही चालेल. आमच्या माहितीनुसार राज्यातील शेतीपंपाचे 11 हजार कोटी रुपये थकीत आहेत. विजेचा वापर नसतानाही बिलाची आकारणी झाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांची वीजबिल माफी अथवा वीज बिलात सूट देणारी योजना सरकारने जाहीर करावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT