3Raju_Shetty_26.jpg
3Raju_Shetty_26.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कोण असेल स्वाभिमानीचा प्रबळ उमेदवार?

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : सांगली, कोल्हापूर प्रभावी ठरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघात शेतकऱ्याच्या ऊसदरातील प्रभावी आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या मनात स्थान प्राप्त करुन आमदारकी मिळवली. 2019 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रबळ ताकदीचा उमेदवार शोधावा लागणार आहे. त्यामुळेच आज हुन्नुर येथील मेळाव्यात खासदार राजू शेट्टींच्या भुमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
     
साखर कारखानदाराच्या विरोधात ऊसदरावरुन संघर्ष करत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 2009 च्या विधानसभा निवडणूकीत आमदार भारत भालके रुपाने उमेदवार मिळाला एकाकी लढत देत त्यांनी आमदारकी मिळवली. खासदार राजू शेट्टी, कृषीमंत्री सदाभाऊ खोत व आमदार भालके यांनी प्रचार यंत्रणा हाताळली. त्यांनतर भालकेनी स्वाभिमानी साथ सोडत कॉग्रेसशी सलगी केली. त्यात थेट मुख्यमंत्र्यांनशी असलेल्या सलगीतून मतदारसंघात मोठया प्रमाणात निधी मिळविला. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत भाजपाशी युती करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आमदार भालकेच्या विरोधात साखर कारखानदार असलेल्या आमदार प्रशांत परिचारक यांना संधी दिली. स्वाभिमानीला ही जागा राखता आली नसली तरी परिचारकांनीही 90 हजारापेक्षा अधिक मते घेतली. परिचारकांनी विधानपरिषद पदरात पाडून भाजपाचे सहयोगी सदस्य होत मुख्यमंत्राशी सलगी करत पंढरपूर-मंगळवेढयासाठी मोठया प्रमाणात निधी मिळविला. यात निधीत मंगळवेढयाचा हिस्सा कमीच राहिला. याला मंगळवेढयातील नाकारात्मकता कारणीभूत ठरल्याचे बोलून दाखविले. पण 2019 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला या जागेसाठी प्रबळ उमेदवार शोधावा लागणार आहे. त्यासाठी लोकसभा निवडणूकीत ही आपला प्रभाव दाखवावा लागणार आहे. पण 2009 च्या निवडणूकीतून भालके व  2014 नंतर परिचारक व सदाभाऊ खोत नाही आस्तित्व असलेल्या स्वाभिमानी आपले अस्तित्व निर्माण करावे लागणार आहे.

तालुक्यात दुष्काळ निधीस विलंब,दुष्काळाची तीव्रता सर्वच शेतकऱ्यांला जाणवत असताना सन्मान योजनेत फक्त अल्पभूधारकाचा समावेश, खरीप विमा 2017 तालुक्यावर अन्याय, म्हैसाळच्या पाण्यावरुन शेतकऱ्यांची दिशाभूल, विजेची रखडलेली कामे, कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेले लाभार्थ्यी, बॅकाकडून कडून होत असलेली नोटीसीतून वसुली, गाळप ऊसाचा दर, पुर्व भागातील अरळी, सिध्दापूर, डोणज, नंदूरच्या शेतकऱ्यांच्या नावावर विनासहमतीने खासगी कारखानदारांनी काढलेल्या कर्जावर सोलापूरच्या कॅनरा बॅकेनी दुष्काळात दिलेली वसुलीची नोटीस, दुष्काळ जाहीर होवून छावण्या नुसत्या घोषणांवर संघटनेसह कारखानदारासह इतराचे मौन, यासह अन्य प्रश्‍नावरुन तालुक्यातील शेतकरी पिचला असून विदर्भ मराठवाडयातील आत्महत्येचे लोण तालुक्यात आले. या प्रश्‍नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आवाज उठविण्याची मोठी संधी होती. पण यावर त्यांनी म्हणावे तसे लक्ष केंद्रीत केले नाही. आंदोलने केली पण प्रशासनावर प्रभाव पाडू शकली नाहीत .सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांना वालीच नसल्याची भावना निर्माण झाली असून या शेतकरी रोषाचा लाभ घेण्याची संधी आजमितीस तर गमावली आहे. सध्या भाजपाशी पटत नसल्यामुळे त्यांना स्वतंत्र उमेदवार दयावा लागणार आहे. जर कॉग्रेसशी युती झाली तर पुन्हा आमदार भालकेचा प्रचार करावा लागणार की काय हे ही लवकरच स्पष्ट होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT