gopichand padalkar.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

नवीन दरवाढीच्या कराराशिवाय मजूर ऊस तोडणीसाठी जाणार नाहीत : आमदार गोपीचंद पडळकर

नागेश गायकवाड

आटपाडी (जि. सांगली)-   राज्यातील ऊस तोडणी मजूर, वाहतूकदार आणि आणि मुकादम संघटनांचा करार संपला आहे. नवीन दरवाढीचा करार करण्याकडे राज्य सरकार आणि साखर कारखानदारांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे माजी मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली नवीन दरवाढीचा करार मान्य होईपर्यंत राज्यातील ऊस तोडणी मजूर ऊस तोडणीसाठी जाणार नाहीत. त्यांच्या वतीने संप करण्यात असल्याची माहिती भाजपचे प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी माहिती दिली. 

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीमध्ये आमदार पडळकर यांनी गोपीनाथरावजी मुंडे ऊस तोड मजूर, मुकादम व वाहतूकदार संघटना आणि महाराष्ट्र राज्य श्रमिक ऊस तोडणीमधून संघटनेने पुकारलेल्या संपाची माहिती दिली. ते म्हणाले,""माजी मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार आहे. मागण्यासाठी कवठेमंकाळ तालुक्‍यातील ढालगाव, जत तालुक्‍यातील संख, सांगोला तालुक्‍यातील कोळा आणि आटपाडी तालुक्‍यातील झरे येथे माजी मंत्री सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (30) बैठका आयोजित केल्या आहेत. 
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष पप्पू डोंगरे, ब्रह्मानंद पडळकर, तानाजी यमगर, विष्णू अर्जुन, हरिराम गायकवाड आदीं उपस्थिती होते. 

या आहेत मागण्या... 
दरवाढीचा नवीन करार मान्य होईपर्यंत ऊसतोडणी न करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. ऊस तोडणी वाहतूक दरात वाढ करावी, मुकादमच्या कमिशनमध्ये वाढ करावी, सर्व कारखान्यात शौचालय सुविधा असल्याशिवाय गाळप परवाना देऊ नये, मजूर व बैलांचा संपूर्ण विमा कारखान्याने उतरावा या व अन्य मागण्यांसाठी करार होईपर्यंत संप केला जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dam Water Level : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! धरणांमध्ये 70 टक्के पाणीसाठा, पाणीटंचाईला दिलासा!

Nagpur News : सांगा, कसं करायचं आपत्ती व्यवस्थापन? अनेक गावं धोकादायक पातळीवर, पण सरकार अजूनही झोपेत, ९१ गावांत ‘व्हिलेज किट’च नाही...

Guru Purnima : 'श्री स्वामीचरणी तीन लाख भाविक नतमस्तक'; स्वामीनामाच्या जयघोषात श्री वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी

11th Admission Process: अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी 'या' तारखेला होणार जाहीर; जाणून घ्या जाणून घ्या प्रवेशाचे पुढचे टप्पे

धक्कादायक! प्रेमसंबंधातून जन्मदात्या आईने पोटच्या तीन निष्पाप मुलांची केली हत्या; प्रियकराला जन्मठेप तर, आईला मृत्युदंडाची शिक्षा

SCROLL FOR NEXT