zoom meeting taken in the meeting office bearers and administration chairmanship of Sub Divisional Officer Nagesh Patil in islampur 
पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपुरात पुन्हा तीन दिवसाचा कडक लाॅकडाऊन

धर्मवीर पाटील

इस्लामपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहर २३, २४ व २५ ऑगस्ट रोजी तीन दिवस पूर्ण बंद करण्याचा निर्णय आज येथे पदाधिकारी व प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी नागेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झूम मीटिंग झाली.


तीन-चार दिवसात शहरात कोरोना संसर्गाची तीव्रता वाढत चालली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी देखील जनता कर्फ्युचे पालन करावे, अशा सूचना केल्याने आज नगरपालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाने ऑनलाइन बैठक घेत शहर तीन दिवस बंदचा निर्णय घेतला. 


उपनगराध्यक्ष दादासो पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, चेतन शिंदे, कोमल बनसोडे, मंगल शिंगण आदी बैठकीत सहभागी झाले. प्रांताधिकारी श्री. पाटील म्हणाले,‘‘वाढता संसर्ग विचारात घेऊन बंदचा निर्णय घेतला. मेडिकल, दुधविक्री वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. लोकांनी बाहेर पडू नये, नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाई केली जाईल. बंद टप्प्याटप्प्याने केला जाईल. घरगुती उत्सव विचारात घेऊन पुढचा निर्णय जाहीर करू. नागरिकांनी सहकार्य करावे.’’

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

SCROLL FOR NEXT