z.p. sangli.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

झेडपी मुख्यालय कर्मचाऱ्यांना 27 पासून तीन दिवस "वर्क फ्रार्म होम' 

विष्णू मोहिते

सांगली, ः कोरोना संदर्भात कामकाज करणारे कर्मचारी वगळता झेडपी मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी 27 ते 29 जुलै या कालावधीत जिल्हा परिषद कार्यालयात उपस्थित राहण्याची आवश्‍यकता नाही. अशा सर्व कर्मचाऱ्यांनी घरुनच आपल्या विभागाशी सबंधित शक्‍य ते कामकाज पार पाडावे, असे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी काढला आहे. सांगली जिल्हा परिषदेतील कोरोना नियंत्रण कक्षातील सहा अधिकारी-कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना शुक्रवारी वाळवा तालुक्‍यातील दोघांचा मृत्यू झाला. रोजावाडी येथील 51 वर्षीय माजी उपसरपंच आणि कामळवाडी येथील 57 वर्षीय बाधित पुरुषाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या 44 वर पोहोचली. जिल्ह्यात नव्याने 166 रुग्ण आढळले असून त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील 117 रुग्णांचा समावेश असून त्यामध्ये सांगलीत 74 तर मिरजेतील 43 रुग्णांचा समावेश आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यात अठरा, शिराळा तालुक्‍यात बारा, मिरज तालुक्‍यात चार, खानापूर व आटपाडी तालुक्‍यात प्रत्येकी एक, पलूस तालुक्‍यात पाच, जत आणि वाळवा तालुक्‍यात प्रत्येकी तीन आणि तासगाव तालुक्‍यात दोन रुग्ण आढळले. 

...... 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT